शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यावरून राजकीय वादाची नव्याने ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 01:26 IST

अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वादाला तोंड फोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी भोकरदन येथील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सत्कार सोहळ्यात लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वादाला तोंड फोडले. या खोतकरांच्या प्रतिक्रियेवर भाजपने मात्र, सावध भूमिका घेतली असून, खोतकरांशी चर्चा झाल्यावरच या बद्दल बोलता येईल असे मत भाजपच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन मंत्री अर्जुन खोतकर यांनी विद्यमान खा. तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द लोकसभा लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मध्यस्ती करून खोतकरांना माघार घ्यायला लावली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत खोतकरांनी दानवेंना विजयी करण्यासाठी सर्व ते सहकार्य केल्याचा दावा त्यांनी केला. परंतु नंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाहिजे तशी साथ मिळाली नसल्यानेच आपण पराभूत झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात खोतकरांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, दानवेंवर आपला रोष नाही, परंतु भाजपच्या शहर आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी मात्र, मला साथ देण्या ऐवजी काँग्रेसला मदत केल्याचे आपल्या कानावर आता येत असल्याचे ते म्हणाले.एकूणच शनिवारी भोकरदन येथील कार्यक्रमात खोतकरांनी लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेतल्याबद्दल जनतेची माफी मागतो असे सांगून एक प्रकारे आगामी निवडणूकीत दानवे विरूध्द खोतकर असा समाना रंगू शकतो असे संकेत दिल्याची जोरदार चर्चा रजकीय वर्तुळात आहे. खोतकरांच्या आजच्या वक्तव्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्क केला असता, आपण खोतकरां सोबत चर्चा केल्यावर यावर प्रतिक्रिया देऊ असे स्पष्ट केले. या खोतकरांच्या वक्तव्याची दिवसभर शहरात चर्चा रंगली होती.

 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना