शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नऊ मार्चला होणार बागेश्वरी साखर कारखाना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:29 IST

आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आजवर बागेश्वरी साखर कारखान्यातून २ लाख ५१ हजार मे. टन उसाचे सरासरी गाळप झाले आहे. यातून २ लाख ८२ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, ९ मार्च रोजी कारखाना बंद होणार आहे.परतूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा बागेश्वरी साखर कारखाना सुरू झाला तेव्हापासून आजवर सुरळीत व शिस्तीत सुरू आहे. त्यामुळे या भागात नामशेष होणारे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. कारखाना प्रशासनाने उसाचे क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांना अनेक सुविधा व योजना राबवून ऊस लागवडीस चालना दिली. यामुळे या भागात उसाचे क्षेत्र वाढले. शेतक-यांनाही आपला ऊस जाण्याची हमी मिळाल्याने अल्प पाण्यावर नियोजन करून शेतकरी उसाकडे वळला. निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. शेतक-यांनी या पाण्यावर पाईपलाईन करून उसाची लागवड केली. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उसाचे पीक धोक्यात आले आहे.मध्यंतरी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणी शहराची तहान भागविण्यासाठी सोडण्यात आले होते. यावेळी निम्न दुधना प्रकल्प पूर्ण रिकामा झाला होता. यंदा मात्र, परतीच्या पावसाने या धरणात थोडे फार पाणी येण्याबरोबरच उसाच्या पिकाला जिवदान मिळाले.यावर्षी कारखाना परिसरात ७ हजार हेक्टर वर ऊस होता. तर मागील वर्षी १० हजार हेक्टरवर ऊस होता. मागील वर्षी एक महिना लवकर कारखाना सुरू होऊन १२ एप्रील २०१९ रोजी परिसरातील उसाचे पूर्ण गाळप करून बंद झाला होता. यावर्षी मात्र एक महिना उशीरा सुरू होऊनही महिना अगोदरच बंद करण्याची वेळ येत आहे.परिसरात केवळ २५ हजार टन ऊस गाळप राहिला आहे. हा कारखाना जास्तीत जास्त ९ मार्च पर्यंत चालण्याची शक्यता कारखाना प्रशासनाने व्यक्त केली आहे. याचे कारण ब-याच शेतक-यांनी बाहेरच्या कारखान्यास ऊस दिला आहे. मागील वर्षीही काही शेतक-यांनी बाहेर ऊस दिला होता. मात्र, कारखान्याने त्या शेत-यांचा ऊस सहानभुती दाखवून आणला होता. पुढील वर्षी हे चित्र बदलणार आहे. ज्या शेतक-यांनी बाहेर ऊस दिला. त्यांचा ऊस आणण्याची जबाबदारी कारखाना घेण्याची शक्यता कमी आहे. कारण, यावर्षी परतूर तालुक्यात व कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी