शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भुजबळांच्या एल्गार सभेला सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 13:39 IST

आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

जालना -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक कलगीतुरा सुरू आहे. आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींची एल्गार सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधत ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नसल्याचं म्हटलं. छगन भुजबळ यांच्या एल्गार सभेला उत्तर देण्यासाठी आता सकल मराठा समाजाकडून जालन्यातच मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील आझाद मैदानात १ डिसेंबर रोजी ही सभा होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यासाठी काल (१८ नोव्हेंबर) सकल मराठा समाजासाठी जालन्यात बैठक पार पडली. या बैठकीत सभेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसंच सभेला लाखोंची गर्दी जमावी, यासाठी पुढील काही दिवसांत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जालन्यात १ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर!

छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेत जरांगे पाटील यांच्यावर काही वैयक्तिक आरोप केले होते. तसंच मराठा समाजाने विविध ठिकाणी लावलेले गावबंदीचे फलक, बीडसारख्या शहरांत झालेल्या जाळपोळीच्या घटना यांवरही भाष्य करत दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. भुजबळ यांच्या या टीकेला जालन्यातील सभेतून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सभेच्या दिवशी शहरातील व्यापारी बांधवांचं नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही बंदचं आवाहन केलं जाणार नसल्याचंही मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अंबड येथील सभेत काय म्हणाले होते छगन भुजबळ?

"मराठा समाजाचा आता एक नवीन नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. पण त्यांचा अभ्यास नाही. आम्हाला आरक्षण घटनेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. मंडल आयोगाने दिलं आहे. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, तुझ्यासारखे सासरच्या घरी तुकडे मोडत नाही. दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला? गावबंदीचे फलक लावता, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिला आहे का?" असा सवाल करत छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण