शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:38 AM

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़दिपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमानंतर खा़ दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेत्तृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहेत, मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडूण जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा मुद्दा निवडणुकीत समोर ठेऊन पक्ष संघटन कामाला लागले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेची युती होती मात्र त्यानंतर विधानसभेच्यावेळी युती तुटली होती या वेळी निवडणुक युतीने लढवावी ही भाजपाची इच्छा आहे, मात्र मित्रपक्षाची आद्याप भूमीका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व ४८ मतदार संघामध्ये तयारी केली आहे. युती झाली तर आम्ही केलेली तयारी त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जर नाही झाली तर मात्र आम्हांला लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी सांगून आपण गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदार संघाचा दौरा केला असून, सध्या जळगाव, धुळे, नंदूरबार, दिंडोरी, रावेर, नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदार संघात आपला पक्ष संघटनाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले़ संध्या दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे सरकार हे शेतक-याच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असुन वेळ प्रंसगी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी सरकार मागे हटणार नाही असे दानवे यांनी सांगुन या निवडणुकीत भाजप विकास कामावर निवडणुक जिंंकेल मात्र त्याच बरोबर पक्षाने राम मंदिराचा प्रश्न सुध्दा सोडला नसल्याचे ते म्हणाले.समोरून कोण उमेदवार येईल यांची चिंंता नाही़पत्रकारानी आपण राज्याच्या दौ-यावर असतात मग जालना लोकसभा मतदार संघाकडे कसे लक्ष देणार अशी विचारणा केली असता, दानवे म्हणाले की आपण जमीनीवर पाय ठेऊन चालणारे कार्यकर्ता आहोत. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी लक्ष मात्र जालना लोकसभा मतदार संघावरच असते. या मतदार संघात ६ हजार कोटीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत, अनेक महत्वाचे प्रकल्प मंजुर झाले आहेत, शिवाय आपण मतदारांच्या कायम संपर्कात असतो त्यामुळे समोरून कोण उमेदवार येईल यांची आपल्याचा चिंंता नाही, या मतदार संघातील ८० टक्के निवडणुकीचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे दानवे यांनी सांगितले़

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूक