शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

बदनापूर मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:59 IST

अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा कुचे यांच्या कामी आली असून, भोकरदन तालुक्यातूनही कुचे यांना मोठी लीड मिळाली.बदनापूर विधानसभा मतदार संघात खरी लढत ही भाजपचे नारायण कुचे व राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यात झाली. निवडणूक प्रचारात झालेले आरोप- प्रत्यारोप, आघाडीने केलेली मोर्चे बांधणी, निवडणूक रिंगणातील इतर उमेदवार पाहता अनेकांनी या निवडणुकीत कुचे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा, प्रत्येक बुथवर लावलेली फिल्डींग ही तगडी होती, हेच या निकालातून दिसून आले.बदनापूर विधानसभा मतदारसंघात बदनापूर, भोकरदन, अंबडसह अन्य दोन तालुक्यांतील गावे आहेत. मात्र या तीन तालुक्यांतील गावे मोठ्या प्रमाणात आहेत़ यापैकी भोकरदन तालुक्यातील गावांची मतमोजणी प्रथम सुरू झाली होती. त्यामधे आ. नारायण कुचे यांना भोकरदन तालुक्यातील गावांमधून एकूण १० हजारांचे मताधिक्य मिळाले आणि हे मताधिक्य पुढे वाढतच गेले़ मात्र हे बदनापूर व अंबड तालुक्यात भोकरदन तालुक्याएवढे मताधिक्य मिळाले नाही़बदनापूर शहरात लोकसभेच्या निवडणुकीत ९६५ मतांचे मताधिक्य आघाडीच्या उमेदवाराला मिळाले होते. मात्र यावेळी आ. नारायण कुचे यांना शंभर मतांची आघाडी मिळाली. म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा महायुतीला यावेळी बदनापूर शहरातून एक हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत़ त्यातही शहरातील वार्ड क्र २ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला ४७५ मतांची आघाडी मिळाली.सलग आठ फेऱ्यांमधे महायुतीचे उमेदवार आ. नारायण कुचे यांना मताधिक्य मिळत असताना ९ व्या फेरीत आघाडीचे बबलू चौधरी यांना अवघ्या दहा मतांचे मताधिक्य मिळाले होते.नंतरच्या काही फे-यांमधेही मताधिक्य मिळाले. मात्र पुढे त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली नाही.नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे खा. रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून तब्बल ६३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला त्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले.यावरही भाजपला चिंतन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019badnapur-acबदनापूरBJPभाजपा