शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

‘जलयुक्त’ची एक हजार कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 12:40 AM

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर कामांपैकी आतापर्यंत एक हजार तीन कामे पूर्ण झाली असून, कृषी विभागाने सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर कामांपैकी आतापर्यंत एक हजार तीन कामे पूर्ण झाली असून, कृषी विभागाने सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली असून, गाव आराखड्यानुसार दोन हजार ५४६ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कृषी, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, भूजल सर्वेक्षण, वनविभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, जलसंपदा या विभागांतर्गत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आतापर्यंत नाला खोलीकरण-रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, सलग समतल चर, बांध-बंदिस्ती, तलावांमधील गाळ काढणे, जलपूर्णभरण आदी दोन हजार ५४२ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे.पैकी दोन हजार १९९ कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, ही कामे सुरू आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यात सर्वाधिक ७९५ कामे पूर्ण केली आहेत. तर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा या विभागांनी आतापर्यंत एकही मंजूर काम पूर्ण केलेले नाही.वनविभाग, सामाजिक वनीकरण व पंचायत समिती कार्यालयाने आतापर्यंत अनुक्रमे केवळ १६, ११ व १३ कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाची बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. जूनअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना