शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कोरोनामुळे शासनाच्या कर्जमाफी प्रक्रियेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:03 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे. शहरी, ग्रामीण भागातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्रांवरील बायोमेट्रिक बंद करण्यात आहे. या योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५५० कर्जखात्यावर तब्बल ७१५ कोटी ४२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या दोन याद्यांमध्येच जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी अर्ध्याहून अधिक लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. आजवर बँका, सोसायट्यांकडून १ लाख ६२ हजार २६८ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पैकी १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये आली आहेत. आधार प्रमाणिकरणानंतर १ लख १७ हजार ५५० कर्जखात्यांवर ७१५ काटी ४२ लाख रूपये जमा झाले आहेत. तर अद्यापही जवळपास ६० हजार शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.३१ मार्चपर्यंत स्थगिती आदेशही प्रक्रिया गतीने सुरू असतानाच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. जालना जिल्ह्यातही जवळपास १० संशयित आढळून आले. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्र, महा आॅनलाईन केंद्रावरील बायोमेट्रिक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रावर शासकीय कामांसाठी नागरिकांची होणारी गर्दी, बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovernment schemeसरकारी योजनाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी