शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्ह्यात बोंडअळीने कापूस पोखरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:19 AM

खरिपाच्या पहिल्या टप्प्यात पावसाने दिलेली उघडीप त्यानंतर ऐन वेचणीच्या वेळी परतीच्या पावसाने दिलेला दणका यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.

जालना : खरिपाच्या पहिल्या टप्प्यात पावसाने दिलेली उघडीप त्यानंतर ऐन वेचणीच्या वेळी परतीच्या पावसाने दिलेला दणका यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. बोंडअळीने तब्बल पावणेतीन लाख हेक्टरवरील कपाशी पोखरली आहे. कपाशीवरील ही नैसर्गिक संकटे आणि मिळणारा अल्प दर यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.कपाशीवर यंदा सुरुवातीपासून वेगवेगळी नैसर्गिक संकटे आली. हिवाळ्यात थंडीमुळे बागायती कपाशीला नवीन पाते व बोंड लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेतकरी रात्रं-दिवस जागून कपाशीला पाणी देण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, बोंडअळीमुळे कपाशीची बोंडे किडत असून, खाली पडत आहेत. परतूर तालुक्यातील ३९ हजार हेक्टर, मंठा १८ हजार , घनसावंगी ३५ हजार, जालना ४० हजार, बदनापूर ३० हजार, भोकरदन ४४ हजार, जाफराबाद २२ हजार हेक्टर, असे एकूण दोन लक्ष ७८ हजार हेक्टर कपाशीचे बोंडअळीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारा कृषी विभाग या प्रकारामुळे आता खडबडून जागा झाला आहे. महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ नुसार संबंधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासह बाधित शेतक-यांना बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतक-यांनी फॉर्म जी फॉरमॅटमध्ये अर्ज भरून संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी विकास अधिकारी, कृषी सहायकाकडे जमा करावेत, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी, परतूर, मंठा तालुक्यातील बोंडअळीने प्रभावित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी जालना तालुक्यातील विविध गावांत बोंडअळीने नुकसान झालेल्या कपाशीची पाहणी केली.--------------गुंतागुंतीची प्रक्रियाफॉर्म जीसोबत बियाणे खरेदीची पावती किंवा बियाणे पिशवीची झेरॉक्स सोबत जोडावी. पावती नसल्यास कोणत्या दुकानातून खरेदी केले त्याचा उल्लेख अर्जामध्ये करावा, अशा सूचना आहेत. शेतक-यांकडून फॉर्म जी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका समितीमार्फत बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविण्यात येईल. कृषी आयुक्तालय संबंधित बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देईल. एक तर कंपनीला भरपाई द्यावी लागेल किंवा त्यांनी उच्च न्यायालयात अपील केल्यास शेतकºयांच्या बाजूने सरकार न्यायालयात बाजू मांडेल, अशी ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.---------------तपासणीसाठी अधिका-यांचा फौजफाटाबोंडअळीमुुळे बाधित जिल्ह्यातील कपाशीच्या मोठ्या क्षेत्राची पाहणी करणे जिल्हा व तालुका कृषी अधिका-यांना शक्य नसल्याने जिल्हा कृषी अधीक्षक यांचे पाहणी अधिकार कृषी विभागातील वर्ग एकच्या अधिका-यांना देण्यात आले आहेत. आठही तालुक्यांसाठी कृषी विभागातील अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी विद्यापीठ व संबधित बियाणे कंपनी यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तालुका बियाणे निरीक्षक यांचे अधिकार मंडळाधिका-यांना देण्यात आले आहेत.