शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जालन्यात दिंडी मार्गाचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 7:38 PM

महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

 परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. हे काम हैदराबाद येथील कंपनीस शासनाने  दिले आहे.  यासाठी परतवाडी शिवारात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवार सकाळी ११ च्या  सुमारास अभियंता अतुल अरूण कोटेचा कर्मचारी व पोलिसांसोबत परतवाडी शिवारात रस्ते कामाची पाहणी करत असताना, परतवाडी येथील सोनाजी आढे, नारायण मोती आढे, पांडुरंग सोपा आढे, वसुरुमगाव येथील आप्पा लहाने हे तिथे आले. मुरुम टाकत असलेली शेती आमची असून त्याचा कुठलाही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. काम बंद न केल्यास स्वत:ला जाळून घेवू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. त्यामुळे अभियंता कोटेचा यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे तीव्र संताप  व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाFarmerशेतकरीhighwayमहामार्गGovernmentसरकार