शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
2
'वरुण' पाऊस कोसळतोय, दुपारी समुद्राला भरती; पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे तळे होणार?
3
कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित
4
एकच साप सहावेळा चावला, पिछा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
5
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
6
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?
7
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
8
रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
9
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
10
Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
11
Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."
12
Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...
13
इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता
14
Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी
15
अंगारकी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
17
रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये
18
बेपत्ता होऊन घरवापसी झालेला 'सोढी' पहिल्यांदाच मीडियासमोर, म्हणाला- "माझा फोन बंद त्यामुळे.."
19
साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक
20
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

सरकारने पेरलेले समाजातील अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी, मनोज जरांगे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:16 PM

मराठा समाजात अनेक अभ्यासकांचा जन्म, असं वाटतंय हे सरकारनेच पेरले: मनोज जरांगे

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : या लोकांना उत्तर द्यायचं सुद्धा मला वाईट वाटतं. मराठा समाजात एवढ्या अभ्यासकांनी जन्म घेतला आहे, असं वाटतंय की सरकार पक्षानेच हे लोक पेरले आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय? यांची पार्श्वभूमी बघितली तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, अशी टीका बाळासाहेब सराटे यांनी केलेल्या आरोपावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आज माध्यम प्रतिनिधिसोबत संवाद साधला.

सगेसोयऱ्यांची मागणी फक्त जरांगे पाटील करत आहे. ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणत्या कायदे तज्ञांनी घातली, माहिती नाही असे बाळासाहेब सराटे म्हणाले होते. मनोज जरांगे पुढे म्हणाले, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात तेव्हा गोड लागलं, आम्ही तुम्हाला चर्चेला पाठवलं तेव्हा गोड लागलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगल आहे. कशाला ते १६ टक्के आरक्षण चॅलेंज केलं. मग मराठा समाजाला, मला ढ समजता का. मला लांब काढायचं का तुम्हाला? जाऊ का बाजूला मी? सरकारने तुम्हाला आमिष दाखवला असेल. अजूनही वेळ गेली नाही. मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले आहे.

महाराष्ट्रभर पाच टप्प्यात शांतता रॅलीउद्यापासून मनोज जरंगे पाटील यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीचा शब्द दिलाय. मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढला पाहिजे. मराठा समाजाला वेळोवेळी रस्त्यावर यावं लागणार आहे. त्यामुळे शांतता रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर पाच टप्प्यांमध्ये शांतता रॅली होणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील