शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

डाळ स्वस्त होणार; खतांच्या दरात मोठी तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:28 AM

जालना : सध्या बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असून, खाद्यतेल वगळता बहुतांश धान्य व किराणा वस्तुमालांचे दर स्थिर आहेत. या ...

जालना : सध्या बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद अल्प असून, खाद्यतेल वगळता बहुतांश धान्य व किराणा वस्तुमालांचे दर स्थिर आहेत. या वर्षी खतांचे दर ५० टक्क्यांनी वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तूर, उडीद आणि मुगाच्या आयातीवर काही काळासाठी सवलत दिली आहे. या निर्णयामुळे तूर, उडद आणि मूग डाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोयाबीन कच्चे तेल, तसेच सीपीओ आणि पामोलिनच्या आयात शुल्कामध्ये शुक्रवारी क्विंटलमागे १५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे खाद्यतेल आणखी महागणार आहे. सध्या पामतेलाचे दर १४,७००, सूर्यफूल तेल १८,०००, सरकी तेल आणि सोयाबीन तेलाचे दर प्रत्येकी १६,००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्याने बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी खताच्या दरांमध्ये तेजी असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल महागल्यामुळे खतांच्या किमतीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झाल्याचे बोलले जाते. फॉस्फेट आणि पोटाशच्या तेजीमधून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा विचार सरकार करत आहे. सबसिडी मिळाल्यास शेतकऱ्यांना खत स्वस्त दरात मिळेल, असे बोलले जाते. सध्या इफको खतांच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १,१७५ तर यंदा १,७७५ रुपयांना खत मिळणार आहे. आयपीएल खतांच्या दरात ७०० रुपयांची वाढ होऊन, १,२०० ऐवजी १,९०० रुपयांना मिळणार आहे. महाधन खतामध्ये ६५० रुपयांची वाढ झाली असून, १,२७५ ऐवजी १,९२५ रुपयांना मिळणार आहे. जीएसएफसी (सरदार) खतामध्ये ६०० रुपयांची वाढ झाली आहे. १,१७५ ऐवजी १,७७५ रुपयांना मिळणार आहे. सुपर फॉस्फेट खतामध्ये १०० रुपयांची तेजी आली आहे. ४०० ऐवजी ५०० रुपयांना मिळणार आहे, अशी माहिती अभिषेक जैन आणि धनाजी गारखेडे यांनी दिली.

गव्हाची आवक दररोज १ हजार पोते

गव्हाची आवक दररोज १ हजार पोते असून, भाव १,७५० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ७०० पोते इतकी असून, भाव १,४०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बाजरीची आवक दररोज ३०० पोते असून, भाव १,२०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. उन्हाळी मुगाची आवक दररोज २५ पोते इतकी असून, भाव ५,००० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सूर्यफुलाची आवक दररोज १०० पोते इतकी असून, ५,६०० ते ६,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, भाव ७,३०० ते ७,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज १०० पोते इतकी असून, भाव ६,३०० ते ६,९०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. हरभऱ्याची आवक ७०० पोते असून, भाव ४,७०० ते ४,९५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.