शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तुमच्या ‘सीआर’साठी आमचा रोजगार हिरावू नका- मजुरांची आर्त हाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:20 IST

जिल्हा प्रशासन तसेच विभागीय आयुक्तांच्या कडक निर्देशामूळे जिल्ह्यातील अवैघ वाळू उपशाला लगाम बसला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा प्रशासन तसेच विभागीय आयुक्तांच्या कडक निर्देशामूळे जिल्ह्यातील अवैघ वाळू उपशाला लगाम बसला आहे. ही बाब निश्चित चांगली म्हणावी लागेल. परंतु ही अवैध वाहतूक आणि उत्खन बंद करत असतांना जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, हाताला काम मिळत नसल्याचे वास्तव आहे. अवैध वाहतुकीवर कारवाई करून जो तो अधिकारी आपण किती सक्षम आहे, हे दाखविण्याचे प्रयत्न जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांसमोर करत आहे.विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील महसूल आणि पोलीसांना दिले आहेत. यात दुर्लक्ष करणाऱ्यांचे सीेआर अर्थात नोकरी पुस्तिकेत कारवाई न झाल्यास त्याची नोंद घेतली जाईल असेही सूचित केले आहे. त्यामूळे प्रत्येक जण वाळूची वाहतूक करणारे ट्रक, टिप्परवर नजर ठेवून आहे. आज अनेक ठिकाणी धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्यामूळे वाळूचे भाव वाढले असून, एक ब्रासचे ट्रॅक्टर चक्क पाच हजार रूपयांना मिळत असून, एक टिप्पर थेट ३० हजार रूपयांना मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामूळे प्रशासनाच्या कारवाईने बांधकाम ठप्प झाले आहेत.सध्या औद्योगिक क्षेत्रात मंदी असल्याने रोजगाराची संख्या कमी झाली आहे. अनेकांना रोजगार मिळत नसून, सध्या रोजंदारीवर हक्काचा रोजगार मिळणारे एकमेव क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षे आहे. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाळू तसेच रॉयल्टी भरण्याच्या नावाखाली स्ट्रोन क्रशरही बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामूळे मजूरांचा अलंकार चित्रपटगृह तसेच जुन्या जालन्यातील बाजार चौकी परिसरात सकाळी हाताला काम मिळेल या आशेवर आलेल्या अनेक मजुरांना काम नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभागLabourकामगार