शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 3:11 PM

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वडीगोद्री ( जालना): "शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची स्वत: पाहणी करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवणार, असे जरांगे म्हणाले. त्यांनी अंतरवाली सराटी येतहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. "निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरलं, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना, जरांगे पाटील म्हणाले, "एसटी कर्मचारी पाठीमागच्या सरकारपासून हाल सोसत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांच्या समस्या सुटत नाहीत. एसटी कर्मचारी जनतेची सेवा करतो, त्याच्या मागण्या का मान्य होऊ नयेत? त्यालाही संसार आहे, पण सरकार त्याचा संसार डुबवायला लागले आहे."

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, "एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत."

शिक्षकांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, बारा बलुतेदारांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. "आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही," असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र