शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाकडे होत आहे दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:30 AM

जाफराबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु, त्या करिता लागणा-या उपाय योजनांकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यात आहे.कमी पावसाअभावी खरीप हंगामात येणारे मका पीक आणि रबी हंगामातील शाळू ज्वारी पिकाची लागवड शेतकऱ्यांना करता आली नाही. म्हणून चा-याचे भाव गगनाला भिडले आहे. जाफराबाद तालुक्यात चा-याचे भाव प्रति शेकडा तीन हजार रुपये होऊन सुद्धा चारा मिळत नाही. त्यामुळे जनावरांसाठी लागणा-या चा-याची सुध्दा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी चा-यासाठी शोधा- शोध करत आहेत. दुष्काळी अनुषंगाने इतर जिल्ह्यात जनावरांकरिता शासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाही.जाफराबाद तालुक्यात अद्यापही चारा छावण्याची मागणी करण्यात आली नसल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. दरम्यान, सध्या तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा धूमाकूळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह प्रशासनही निवडणूकीच्या कामात दंग आहे. परिणामी, तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.जाफराबाद तालुक्यात १०१ गावांपैकी ७० गावांत भीषण पाणी टंचाई आहे. ५० गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर २० गावात विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा होत आहे. ७० गावा करिता ७३ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. असे असले तरी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांनी तीन ते चार किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यातील आहे.

टॅग्स :droughtदुष्काळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक