शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कमी पावसामुळे फूलशेती उद्ध्वस्त, विमा कवच नसल्याने शेतकरी संकटात

By शिवाजी कदम | Published: July 28, 2023 12:57 PM

फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

हसनाबाद : भाेकरदन तालुक्यात पावसाची ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे. काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडला असला तरी काही गावांमध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकांना फटका बसत आहे. तालुक्यातील वालसा खालसा येथील शेतकरी दीपक जाधव यांची फूल शेती कमी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

नगदी पीक म्हणून फुलशेतीकडे पाहण्यात येते. मागील चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने फुलशेती बहरली होती. मात्र, यावर्षी कमी पावसामुळे फुलशेतीत लावलेला खर्च निघणे अवघड झाले आहे. भोकरदन जवळील वालसा खालसा येथील तरुण शेतकरी दीपक सुभाष जाधव यांची गट नंबर १८८ मध्ये ३ एकर शेती आहे. ते दोन एकर शेतीवर फुलशेती करतात. मात्र, समाधानकारक पावसाअभावी फुलझाडे सुकून गेली आहेत.

दहा वर्षांपासून फुलशेतीदीपक जाधव हे दहा वर्षांपासून फुलशेती करतात. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून देखील नोकरी न मिळाल्याने त्यांनी दोन एकरावर फुलशेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तीस हजार रुपये खर्च केले. यात गलांडा, गुलाब, झेंडू या फुलांची लागवड केली. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्यांनी डोक्यावर पाणी वाहून रोपे जगवली. मात्र, जुलै महिना संपायला आला तरी, पावसाने हजेरी न लावल्यामुळे तसेच खराब वातावरणामुळे रोपांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. धुके व जोराचा पाऊस नसल्यामुळे संपूर्ण झाडे वाळून गेली आहेत.

दीड लाखांचे उत्पन्न अपेक्षितयावर्षी दीपक जाधव यांना फुलशेतीतून जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. कुटुंबातील आई, वडील व तीन भाऊ हे कुटुंब यावरच उपजीविका करतात. शेतातून काढलेली फुले सिल्लोड, भोकरदन, राजुरी, चिखली, जालना येथे जाऊन विकतात. दीपक जाधव हे हसनाबाद येथे घरोघरी जाऊन फुलांच्या माळा विकून उदरनिर्वाह करतात. मात्र, फुलशेती उद्ध्वस्त झाल्याने जाधव कुटुंब हवालदिल झाले आहे. या व्यवसायाला विमा कवच नसल्याने सरकारी अनुदान मिळत नाही. त्यातच आता निसर्गाने साथ न दिल्याने जाधव कुटुंबावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालना