शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

शेतकऱ्यांसोबत धोका; पाणी विकत घेऊन झाडे जगवली, अडीच महिन्यांनंतरही मिरच्या लागेना

By दिपक ढोले  | Published: July 25, 2023 5:31 PM

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडे; नर्सरीसह कंपनीविरोधात केली तक्रार

भोकरदन : तालुक्यातील तळणी येथे अडीच महिने होऊन झाडांना मिरच्या लागत नसल्याने १५ शेतकऱ्यांनी नर्सरीसह कंपनीविरोधात पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच नर्सरीसह कंपनीविरोधात कडक कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

भोकरदन तालुक्यातील तळणी येथील पंधरा शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील नवजीवन सिडींग नर्सरीतून प्रिया या वाणाची शिमला मिरचीची रोपे आणली होती. या रोपांची १३ मे २०२३ रोजी लागवड केली होती. त्यावर हजारो रुपये खर्च केले. लागवड केल्यानंतर ४५ दिवसांनंतर फुले लागतात. मात्र अडीच महिने होऊनही फुले, मिरची लागत नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला. शेतात येऊन पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तरी कंपनीकडून आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची लागवड केल्यापासून आतापर्यंत खते, मल्चिंग पेपर, मशागतीसह एकरी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे नर्सरीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला आहे. या निवेदनावर अरुण वाघ, अनिल गायके, संदीप गायके, विठ्ठल गायके, देवीदास वाघ, सुनील गायके, गणपत गायके, राजू गायके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांनी उपटून फेकले झाडेअडीच महिने होऊनही मिरची लागत नसल्याने काही शेतकऱ्यांनी झाडे उपटून फेकली आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारी आणि सौभाग्यवतीचे दागिने गहाण ठेवून मे महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. यंदा पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी विकत घेऊन शिमला मिरची जगवली. यातून भरघोस उत्पन्न मिळून कर्जमुक्त व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, झाडांना मिरच्याच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी