शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांनो, फक्त शेतीवर उपजीविका भागणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:57 IST

शेतीला व्यवसायाचा जोड द्या. पशुसंवर्धनातून आर्थिक स्त्रोत निर्माण करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. महा पशुधन एक्स्पो-२०१९ ला शनिवारी थाटात प्रारंभ झाला. यावेळी बागडे बोलत होते.

भागवत हिरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळ पडतो आहे. पण, आपण दम न खाता उभं राहिले पाहिजे. फक्त शेतीवरच उपजीविका भागणार नाही. शेतीला व्यवसायाचा जोड द्या. पशुसंवर्धनातून आर्थिक स्त्रोत निर्माण करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. महा पशुधन एक्स्पो-२०१९ ला शनिवारी थाटात प्रारंभ झाला. यावेळी बागडे बोलत होते.देशातील पहिल्या पशुधन प्रदर्शन जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना बागडे म्हणाले, संकट येतात जातात. अनेक दुष्काळ मी पाहिले आहेत. पण, आपण मेहनती माणसं आहोत. त्यामुळे खचून जाऊ नका. देवाने दोन हात, दहा बोटं दिली आहेत, हे बहिणाबाई सांगून गेल्या आहेत. ते ध्यानात ठेवा. जगण्यासाठी फक्त शेतीवरच विसंबून राहू नका. पशुधन शेतक-याच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने जोड व्यवसायाच्या नव्या संधी आपल्यापर्यंत आल्या आहेत. मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय कमी आहेत. गार्इंचे संवर्धन करा. त्यातून दुग्ध व्यवसाय करा, असा सल्ला हरिभाऊ बागडे यांनी यावेळी शेतक-यांना दिला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर, जि.प.चे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप आदी उपस्थित होते.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेArjun Khotkarअर्जुन खोतकर