शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 12:37 IST

धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

परतूर (परभणी) : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. अखेर बुधवारी दुपारनंतर धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातीलपाणी परभणीकडे झेपावले आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना पाणी सोडल्यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे.

निम्न दुधना प्रकल्पात केवळ आता मृत साठा शिल्लक आहे. या मृत साठ्यातूनच परभणी जिल्ह्यातील जनावरांच्या पिण्याचे पाणी व परिसरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी धरणातून दुधना नदीच्या पात्रातून बुधवारी दुपारी ३:३० वाजता धरणाचे ६ दरवाजे ०.५० मीटरने उघडून ५ हजार ३४६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जीवित, वित्त हानी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सोडले पाणी.धरण मृत साठ्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पात्रातून पाणी सोडण्यास विरोध केला होता. मात्र, विरोधाला न जुमानता शासनाने आदेश देऊन सदरील पाणी सोडले आहे. पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी युवा नेते नितीन जेथलिया, दादाराव खोसे, बाजीराव खरात, अंशीराम कबाडी, आसाराम लाटे, शिवाजी लाटे, गणेश राजबिंडे, बाबासाहेब लाटे, माउली घेंबड, कैलास बिडवे, हरिभाऊ आकात, आदी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

पाण्याचा अपव्यय होऊ नये - नितीन जेथलियायुवा नेते नितीन जेथलिया म्हणाले की, टंचाई निवारण्यासाठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, नदीपात्रातून सोडण्यात येणारे पाणी हे मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे. धरण मृत साठ्यावर गेलेले आहे. त्यामुळे टँकरद्वारे हे पाणी घ्यावे व किमान १ जूनपर्यंत तरी पाणी सोडू नये, अशी आमची मागणी नितीन जेथलिया यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र