शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गांधीजी यांचे विचार मानवी कल्याणाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:09 IST

जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या वर्तमानात गांधी समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातीलमहात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ‘१५० नंतर गांधी’ या विषयावर १६ वे राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, राष्ट्रीय युवा संगठनचे मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काबरा म्हणाले, अशा शिबिरांची आज तरुणाईला खरी गरज आहे. म्हणून अशा शिबिरात शिबिरार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय युवा संगठनचे माजी संयोजक मनोज ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अशा राज्यस्तरीय शिबिरातून अनेक तरुणांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. हे शिबीर म्हणजे आपले प्रतिबिंब दाखविणारा आरसा असतो. यातूनच आपले व्यक्तित्व घडत असते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन महावीर सदावर्ते यांनी तर आभार डॉ. व्ही. बी. उगले यांनी मानले. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, वकील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दुपारी झालेल्या परिसंवादात प्रा. प्रशांत नागोसे यांनी शिबीर आणि जीवन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुरूवारी जलवायू परिवर्तन या विषयावर सोपान जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcollegeमहाविद्यालयSocialसामाजिक