शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 6:52 PM

लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या शासनाच्या विविध योजनांवरून सरकारवर मनोज जरांगे यांनी साधला निशाणा

- पवन पवारवडीगोद्री: येत्या ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिकविमा, नुकसान भरपाई दिली नाही तर मतदान करून परिवर्तन करा सर्वांचे प्रश्न सुटतील असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. तसेच नवीन स्कीम काढण्याचं काय नाटक करतात, लोकांना नादी लावण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या, त्या आयुष्यभर पुरतील अशी टीका जरांगे यांनी राज्य सरकारवर केली. अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांनी दलित, मुस्लिमांनी , गोरगरीब,ओबीसी आणि शेतकऱ्यांनी मनात आणलं तर शेतकरी कर्जमुक्तीच आंदोलनच मताच्या रूपात बदलेल. त्यानंतर परिवर्तन अटळ आहे. यातूनच गरिबांचे प्रश्न संपणार असा दावा जरांगे यांनी केला. तसेच प्रत्येक वेळी सांगायचं कर्जमाफी देतो, अनुदान देतो, मालाला भाव देतो मात्र, द्यायचे तर काहीच नाही, अशी टीका देखील जरांगे यांनी केली. 

शासनाच्या योजनांवरून सरकारवर निशाणादिवाळीनिमित्त शासन देत असलेल्या आनंदाच्या शिधा योजनेवर बोलत जरांगे यांनी शासनाच्या विविध योजनांवर निशाणा साधला. अर्धा गॅस संपला तरी शिधा मधील तेल वितळत नाही. गोरगरिबांची कामे करा, साड्या, आनंदाचा शिधा देता कशाला? असा सवाल जरांगे यांनी केला. लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस यांनीच आणली असेल. ही सगळी शाळा त्यांचीच असून योग्य वेळी त्यांनी स्कीम आणली. लाडक्या बहिणीला दिलेले पैसे आमचेच आहेत, तुम्ही काय तुमचं शेत, घर विकलं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे घर विकून योजनेला पैसे दिले असं ऐकलं नाही. मालाला भाव द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. लाडकी बहिण चांगली, पण लाडका भाचा आरक्षण मिळत नाही म्हणून मारत आहे, मेहुण्याच्या मालाला भाव नाही, अशी खरमरीत टीका जरांगे यांनी सरकारवर केली. तसेच निवडणुकीत कोणाच्या पैशाला हात लावू नका. तुमच्या लेकरांचे आणि शेतकऱ्यांचे वाटोळ होईल. ते पैसे आयुष्यभर पुरणार नाहीत, असे आवाहन देखील जरांगे यांनी मतदारांना केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना