शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"सरकारला शेवटची संधी"; मनोज जरांगेंचा उपोषण सुरू करण्यापूर्वी निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:09 PM

मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही."; असा निर्वाणीचा इशारा सरकारला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत असलेले जरांगे यांनी आज रात्री पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणामुळे सरकारवर तातडीने काही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील. त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका करत, राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे. यासाठी शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरू करावे. तसेच, आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करण्यात यावेत, अशा मागण्या केल्या. 

जरांगे पाटील भाजपच्या मराठा नेत्यांनाही इशारा दिला की, "जर आरक्षण दिलं नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. मराठा समाजाने राजकारणाचा भाग न होता आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे." जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, भुजबळ वयाच्या अखेरीस चुकीचे काम करत आहेत. त्यांनी धनगर समाजाला सांगितले की, "तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. छगन भुजबळ यांच्या भडकावण्याला बळी पडू नका." आम्हाला राजकारणात जायचे नाही, मात्र समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी हा लढा उभारला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकारला अखेरचा इशारा अन् हे शेवटचे उपोषणजरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल. "रात्री १२ किंवा १ वाजता आमरण उपोषण सुरु करत आहोत. हे शेवटचे आंदोलन असेल, आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला बोंबलत बसावं लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना