शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घोडे तो बहुत है.. बाजार मे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:50 IST

औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे. युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी संयुत्त पत्रक काढून घोडेबाजार न करता प्रामाणिकपणे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. या अनोख्या आवाहनाचे पडसाद रविवारी जालन्यातील बिज शीतल सीडस्च्या सभागृहात पार पडलेल्या युतीच्या बैठकीत उमटले.अनेक जि.प. सदस्य तसेच नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आम्ही प्रामाणिक पणे मतदान नेहमीच करतो, परंतु यंदा आम्हाला घोडे अर्थात खरेदीदार समजून आमचा अपमान झाल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत थेट १९९८ च्या पंतप्रधान वाजपेयींचे सरकार ज्यावेळी एका मताने पडले होते. त्याची आठवण करून देत घोडे तो बहुत है बाजार मे.. लेकीन खरेदीदार नही असे म्हटल्याचे सांगून हशा पिकवला.या बैठकीत दानवे यांनी नगरसेवकांची समजूत काढतांना हा किस्सा सांगितला. तसेच जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेने जो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला आहे, त्यात देखील लवकरात लवकर शिवसेनेने काडीमोड घ्यावा असा सूचक इशाराही बैठकीस उपस्थित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे कटाक्ष टाकत दिला. एकूणच आजची ही बैठक युतीचे उमेदवार अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठीची व्युहरचना आखणारी ठरली. त्याच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. आजच्या बैठकीत राज्यमंत्री खोतकरांनीही अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या मतदारांना व्हीप पाळण्याचे आवाहन केले.या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. १९ रोजी निवडणूक होत आहे. त्याामुळे अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णींकडून मतदारांच्या वैय्यक्तीक भेटींवर भर देऊन संपर्क गतीमान केला आहे.या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह जि.प. सदस्य. नगरसेवकांची उपस्थिती होती.या निवडणुकीत जालना जि.प. ६४, भोकरदन पालिका २०, जाफराबाद नगरपंचायत १९, जालना न.प. ६७, बदनापूर नगरपंचायत १९, मंठा नगरपंचायत १९, घनसावंगी नगरपंचायत १९, परतूर पालिका २३ आणि अंबड पालिका २२ असे २७२ मतदार जालना जिल्ह्यात आहेत. त्यात जालना, भोकरदन, घनसावंगी, परतूर या काँग्रेसकडे असून, उर्वरित युतीकडे आहेत.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकPoliticsराजकारणRaosaheb Danweरावसाहेब दानवे