शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

HSC Result: बारावीतील मुलीच हुश्शार, जालना जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के

By विजय मुंडे  | Published: May 25, 2023 8:46 PM

टक्का घसरला : ९३ टक्के मुली तर ९० टक्के मुलं उत्तीर्ण

जालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. गतवर्षी ९३.९८ टक्क्यांवर असलेला निकाल यंदा घसरला असून, ९१.८८ टक्क्यांवर आला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, ९३.८९ टक्के मुली तर ९०.५७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींविरूद्ध कारवाईही करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३० हजार ६९३ परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात १८ हजार ५९० मुलं व १२ हजार १०३ मुलींचा समावेश होता. त्यातील २८ हजार २०२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ११ हजार ३६४ मुली तर १६ हजार ८३८ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल हा ९१.८८ टक्के लागला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.९८ टक्के लागला होता. या निकालात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होताच परीक्षार्थींनी जल्लोष केला तसेच महाविद्यालयांच्या वतीनेही ठिकठिकाणी गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

४४ कॉपीबहाद्दरांवर झाली होती कारवाईबारावीच्या परीक्षेेत जिल्ह्यातील ४४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली हाेती तर जालना जिल्ह्यात परीक्षेत्तर गैरमार्गाचे २३० प्रकरणे आढळून आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

३६ टक्के रिपिटरही उत्तीर्णफेब्रुवारी- मार्चमध्ये गतवर्षी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ६११ रिपिटर परीक्षार्थींनीही परीक्षा दिली होती. त्यातील २२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ३६.८२ टक्के आहे. त्यात १६१ मुलं आणि ६४ मुलीही उत्तीर्ण झाल्या आहेत.

गत सहा वर्षांतील निकालवर्ष निकालाची टक्केवारीफेब्रुवारी-मार्च २०१८- ८९.९०फेब्रुवारी-मार्च २०१९- ८७.१२फेब्रुवारी-मार्च २०२०- ९०.७२फेब्रुवारी-मार्च २०२१- ९८.९७फेब्रुवारी-मार्च २०२२- ९३.९८फेब्रुवारी-मार्च २०२३- ९१.८८

असा आहे तालुक्यांचा निकलातालुका टक्केवारीजालना- ८८.५४बदनापूर- ९३.१५अंबड- ९१.७६परतूर- ८५.३६घनसावंगी- ९०.३२मंठा- ८९.९८भोकरदन- ९५.७९जाफराबाद- ९३.०८

टॅग्स :JalanaजालनाHSC Exam Resultबारावी निकाल