शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सगळ्या गावांना दिले, मग आम्हालाच का वगळलं; अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचा सवाल

By महेश गायकवाड  | Published: April 03, 2023 5:04 PM

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते.

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या महसूल मंडळातील २२ गावांना शासनाने अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळले.  शेतीपिकांचे नुकसान होऊनही सरकार करत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आपल्या व्यथा मांडल्या. येणाऱ्या सात दिवसांच्या आत अनुदानाच्या यादीत आमचा समावेश करा, नसता आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला.

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक पाण्यात गेले होते. वरुड बुद्रुक मंडळात पडलेल्या पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रात चुकीची झाल्याने या महसूल मंडळातील ९ हजार ७८५ बाधित शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे राजकीय हेतू बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर नुकसानभरपाईसाठी मोर्चा काढला. शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत तालुक्यातील पाच मंडळांपैकी वरुड बुद्रुकचा समावेश करण्यात आला नाही. पर्जन्यमापक यंत्रातील आकडेवारीवरून शासनाने या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळले. दुसऱ्या मंडळातील शेतकऱ्यांची जमीन वरुड मंडळात असताना त्यांना अनुदान मिळत आहे; मात्र या मंडळातील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. ही शासनाच्या यंत्रातील चुकीचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला आहे.वरुड बुद्रुक मंडळातील अनेक गावे ही डोंगराळ भागाला जोडून असल्याने सततच्या अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेली होती. शेतात पाणी साचल्याने शेतातील पिके सडून गेली होती. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टीची नाेंद होते. प्रत्यक्षात पीक पाण्याखाली तरी यंत्रात नोंद होत असेल तर त्याच्यात आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती रमेश गव्हाड, मयूर बोर्डे, गजानन लोखंडे, एल. बी. शिंदे, मंगेश गव्हाड, राजेंद्र सोनवणे, गजानन शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालनाagricultureशेती