शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

जनआक्रोश मोर्चा ते उपोषण; मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण लढ्याची वर्षपूर्ती, असे झाले आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:14 IST

५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या, पूर्ण न्याय मिळेपर्यंत मराठा समाज मागे हटणारच नाही: मनोज जरांगे-पाटील

जालना / वडीगोद्री : समाजाने उठाव केल्यानेच आज एक वर्षानंतरही मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा त्याच जोमाने सुरू आहे. या लढ्यामुळे मराठ्यांच्या कुणबी नोंदींचा शोध झाला. ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. परंतु, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांबाबत शासनाने वेळाकाढूपणाची भूमिका घेतली आहे. आमचा लढा न्याय मागण्यांसाठी आहे आणि त्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शहागड येथे असंख्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत जनआक्रोश आंदाेलन करीत मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी शहागड येथे जनआक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. लाखो मराठा समाज बांधवांनी यात सहभाग घेतल्याने आजही हे आंदोलन सुरू आहे. मराठ्यांच्या ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. परंतु, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, बॉम्बे गव्हर्मेंट, हैदराबाद गव्हर्मेंट, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे आदी मागण्यांबाबत शासनाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. केवळ समितीला मुदतवाढ देण्याचे धोरण अवलंबिले आहे. परंतु, समाजाच्या उठावामुळे आणि ताकदीमुळेच गत वर्षभरापासून आमचा लढा सुरू आहे. आणखी कितीही दिवस झाले तरी आम्ही आमच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही. समाजाने मोठा त्रास सहन केला असून, त्यांचा वेळ आणि योगदान वाया जाऊ देणार नाही, समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना जात नसते :आरक्षण ही केंद्र आणि राज्य शासनाची सुविधा असून, ती आम्ही मागत आहोत. त्यात जातीयवाद नाही. मराठा आरक्षणासोबतच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीही लढा उभा केला जाणार आहे.शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी, २४ तास शेतीला वीज द्यावी, पाणी उपलब्ध करून द्यावे, पिकाला भाव द्यावा आदी मागण्या केल्या आहेत.या मागण्या मान्य न झाल्यास आठरापगड जातींना सोबत घेऊन मिशन २०२४ राबविणार असून, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सत्तेतून पायउतार केले जाणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

...तर आपण राजकीय भाषा बोलणे बंद करू राजकारणात जाण्याची आपल्याला हौस नाही. शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे समाजाच्या निर्णयानुसार आपण निर्णय घेणार आहोत. आमच्या मागण्या मान्य केल्या तर आपण राजकीय भाषा बंद करू. परंतु, मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले तर समाज त्यांचा कार्यक्रम लावेल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

वाशी शहर गाठताच निघाला अध्यादेशमनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी २०२४ रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा सुरू केली होती. ही पदयात्रा २५ जानेवारी राेजी वाशी शहरात पोहोचली. जरांगे पाटील यांच्या या यात्रेची दखल घेत त्यावेळी शासनाने मराठा आरक्षणचा अध्यादेश काढला होता. जरांगे पाटील यांच्या या पदयात्रेने देशाचे लक्ष वेधले होते. यात राज्यभरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

१४ ऑक्टोबर रोजी झाली विराट सभामनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्यादरम्यान १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी गावाच्या शिवारात सभा घेतली. जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. अंतरवाली सराटी गावच्या शिवारात मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली ही विराट सभा शासनाच्या मनात धडकी भरविणारीच ठरली होती.

पहिलं उपोषण : २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३- १७ दिवसदुसरं उपोषण: २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३- ९ दिवसतिसरे उपोषण: १० ते २६ फेब्रुवारी २०२४- १७ दिवसचौथे उपोषण: ४ जून ते १३ जून २०२४- १० दिवसपाचवे उपोषण: २० ते २४ जुलै २०२४- ५ दिवस

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना