शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती

By शिवाजी कदम | Published: August 08, 2023 7:25 PM

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे.

- अब्दुल रऊफ शेख

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. सध्या धरण पूर्णपणे कोरडे झाल्याने ही बाब निदर्शनास आली आहे. भिंतीच्या बाजूला काम सुरू असल्याने कामामुळे हे भगदाड पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सिंचन विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. मात्र, यंदा हे धरण पूर्णपणे कोरडे झालेले आहे. यामुळे सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड उघड झाले आहे. या धरणाच्या बांधकामाला १९५८ मध्ये सुरुवात झाली होती. १९६२ च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाला. सुरुवातीला या धरणातून केवळ रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. परंतु, धरणातून भोकरदन शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव कोठा ठरवण्यात आला. डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी गोदावरीपर्यंत सोडले जात आहे. मागील पाच वर्षांपासून धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओसंडून वाहत होते. मात्र, यंदा धरणाने तळ गाठला असून, ते कोरडे पडले आहे.

दगड निखळलेकाही वर्षांपूर्वी धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाणी झिरपू नये म्हणून भिंतीला दगड बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या हे दगड निखळले आहेत. यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे भगदाड पाणी विसर्ग होऊन भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळाली

जुई धरणाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळालेली आहे. ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. तेथील कामे तत्काळ सुरू करण्यात येतील. धरणाच्या भिंतीमुळे धोका निर्माण होणार नाही.- एम.जी. राठोड, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरण