शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 1:04 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडून काही चांगले आणि अर्थकारणाला गती देणारे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरल्याचे अर्थतज्ज्ञ, विरोधकांचे म्हणणे आहे.

जालना : देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. मंदीसदृश वातावरण असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडून काही चांगले आणि अर्थकारणाला गती देणारे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरल्याचे अर्थतज्ज्ञ, विरोधकांचे म्हणणे आहे. तर हा अर्थसंकल्प प्रेरणादायी असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.दिशा देणारे अनेक निर्णयकेंद्र सरकारने देशातील सर्व बाबींचा अभ्यास करून अर्थतज्ज्ञांनी ज्या ज्या काही सूचना केल्या होत्या त्यातील बहुतांश सूचनांचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी स्वीकारल्या आहेत. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यासह अनेक सकारात्मक बाबी अर्थसंकल्पात समाविष्ट आहेत. घरकुल योजना, मागासवर्गीयांच्या विकासासाठीची तरतूद, उच्च शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या बाबींना महत्त्व दिले आहे. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्रीकेवळ हातचलाखीआजचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे एक प्रकारची हातचलाखी, असेच म्हणावे लागेल. एका हाताने देताना दुस-या हाताने ते अप्रत्यक्षपणे वसूल केले जात आहे. मंदी, बेरोजगारी आणि जीडीपीची घसरण या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ जीडीपी वाढेल, अशी आशा दर्शविली आहे. मात्र, त्यासाठीचे उपाय सूचविलेले नाहीत. शेती आणि त्यासंबंधातील पूरक योजनांसाठी आणखी तरतूद गरजेची होती. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे, केवळ घोषणाबाजी केल्यासारखा जाहीर केला आहे. त्यात कुठलेच असे आर्थिक निकष आणि तरतुदी दिसत नाहीत.- राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्यसब तरफ गम..केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून मोठ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मंदी, बेरोजगारी आणि वाढती महागाई यातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, केवळ मोठमोठे आकडे जाहीर करून लोकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प कही खुशी, कही गम म्हणण्याऐवजी सब तरफ गम, असेच याचे वर्णन करता येईल. - आ. कैलास गोरंट्यालजुन्या योजनांना पॉलिशकेंद्र सरकारने विदेशी गुंतवणूकदार, परकीय कंपन्यांना करात सवलत देऊन स्थानिक उद्योजक व मोठ्या करदात्यांना ३३ टक्के कर लावला आहे. शेतकऱ्यांसाठी जुन्याच योजनांना पॉलिश करून १६ सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. १५० खाजगी रेल्वे सुरू करण्याची घोषणा म्हणजे खाजगीकरणाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे.- अर्जुन खोतकर, माजी मंत्रीशेतीला विकासाच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भारतासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी, शेती उत्पादन वाढीसाठी १६ सूत्री कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. केंद्राचा हा अर्थसंकल्प शेती व शेतक-यांना विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. - बबनराव लोणीकर, माजी मंत्रीठोस असे काहीच नाहीअर्थमंत्री निर्माला सितारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत, त्यातून व्यापारी, उद्योजकांना फारसा लाभ होणार नाही. ‘विवाद से विश्वास’ ही योजना चांगली म्हणावी लागेल. या योजनेत व्यापारी आपला विवादित कर ३१ मार्च पर्यंत भरत असल्यास व्याज आणि दंड माफ होते. परंतु, या योजनेमध्ये कराची रक्कम मोठी असल्याने त्याचा लाभ नाही. आयकर कमी केल्याचा केवळ दिखावा म्हणावा लागेल. जीएसटी कायद्यात सरळपणा येईल, असे वाटले होते. परंतु, तेही आज जाहीर झाले नाही.- निखिल बाहेती, सीए, जालना

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Economyअर्थव्यवस्थाPoliticsराजकारणchartered accountantसीए