शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

न्याय, क्षमा आणि परोपकार ही तंटामुक्तीची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:37 AM

न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.

ठळक मुद्देमौलाना बशीर अहमद राही : मुस्लिम कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले.येथील दु:खीनगरमध्ये जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात मुस्लिम कौटुंबिक समुपदेशन केंद्राचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मौलाना इलियास फलाही, काजी मुफ्ती अब्दुल रहमान, मौलाना सुहेल नदवी, मौलाना अ. रऊफ नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांची उपस्थिती होती.मुस्लिम समाजातील तंटे आपसात मिटविण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यालयात समुपदेशन केले जाणार आहे.तंटे सामोपचाराने मिटले तर त्यात सर्वांचेच हित असते, असे मौलाना इलियास फलाही म्हणाले. शहर काजी मुफ्ती अब्दुल रहमान म्हणाले की, तंटे शांतीच्या मार्गाने सुटले पाहिजे. त्यातून वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार नाही. कोणताही मुसलमान जर व्यक्तिगत कायद्याचे (पर्सनल लॉ) पालन करत असेल तर ही भारतीय संविधानाच्या संरक्षणाची हमी आहे. तर मौलाना सुहेल नदवी म्हणाले, तंटामुक्तीसाठी अनेक संघटना काम करीत असल्या तरी अपेक्षित बदल दिसून येत नाही. कारण जो कोणी इतरांमध्ये बदल पाहू इच्छितो, तो स्वत:ला मात्र विसरतो.मौलाना सुहेल नदवी, मुफ्ती अनस खान नदवी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मौलाना हाफीज शब्बीर अहमद यांनी केले. तर आभार प्रदर्शन सय्यद शाकेर यांनी मानले. मौलाना गुलाम अहमद नदवी, शेख मुजीब, मौलाना ईसा खान काशफी, मौलाना अहमद नदवी, हाफीज तहसिन आलम, हाफीज आमेर मौलाना यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.