शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:06 PM

सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे: मनोज जरांगे

वडीगोद्री( जालना ) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सरकारचं लक्ष गोरगरीब जनतेवर नसून फक्त आणि फक्त सत्तेवर केंद्रित आहे. "त्या छोट्या लेकरांना काही कळत नाही अन् कायदा सुव्यवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत," अशी खरमरीत टीका जरांगे पाटील यांनी केली.

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करून नेत्यांच्या पुरोगामी भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांच्या एकत्र येण्याचा उल्लेख करत जरांगे यांनी इशारा दिला की, सरकारला या समाजांवर होणाऱ्या अन्यायाची किंमत चुकवावी लागेल. "पाच वर्षांत काहीच न करणारे, आता निवडणुकीच्या तोंडावर वचनं देतात," असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आमचे घोंगडी खाली हात गुंतलेले आहेत, असं त्यांच्यातले लोक आम्हाला सांगताय, कोणाला ही फडणवीस आरोप करायला लावताय. संघर्ष आणि लढाई वेगळा भाग आहे आणि आरक्षण वेगळा भाग आहे. माणसाचे मन जिंकावे लागतात तेव्हा सत्ता येते. आमच्या गोरगरिबांच्या हातात सत्ता आली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांना कधीच गुंतवणार नाही. तुम्ही राजीनामा देऊ नका, गोरगरिबांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, ज्यामध्ये २० मिनिटे चर्चा झाली. अशोक मुंढे हे गेवराई मतदार संघातून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, परंतु त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस