शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मनोज जरांगेंनी पहाटेच्या बैठकीत 'तो' प्रश्न विचारला अन् निवडणुकीतून माघारीचा निर्णय झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 10:50 IST

मनोज जरांगे पाटलांनी अचानक माघार का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत स्वत: त्यांनीच खुलासा केला आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांकडून अद्याप यादी न आल्याने आणि एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नसल्याचं सांगत जरांगे यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून निवडणूक लढवण्यासाठी खलबतं करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक माघार का घेतली, असा प्रश्न उपस्थित होत असताना याबाबत स्वत: त्यांनीच खुलासा केला आहे.

"मराठा-मुस्लीम-दलित या शक्तीच्या आधारे आपण निवडणुकीला सामोरे जाणार होतो. त्यानुसार काल आपली मित्रपक्षांसोबत चर्चा झाली होती. आम्ही सायंकाळपर्यंत आमचे उमेदवार कळवतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. मात्र काल रात्रीही त्यांच्याकडून उमेदवार यादी देण्यात आली नाही आणि अजूनही त्यांची यादी आली नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही पहाटे ३ वाजता सगळे सहकारी एकत्रित बसलो. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. असं असताना अजून जर मित्रपक्षांची यादीच आली नसेल तर आपण अर्ज मागे कधी घेणार? आणि मित्रपक्ष सोबत नसतील तर फक्त एका जातीच्या आधारावर निवडणूक लढवायची का? असा प्रश्न मी सर्वांना विचारला. त्यावर सगळ्यांनी नको असं सांगितलं. त्यामुळे आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आहोत," अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

विधानसभा निवडणुकीत काय असणार जरांगेंची भूमिका?

"समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा," असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज केलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण