शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 07:02 IST

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीचाही गनिमी कावा ठरला आहे. समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली. एकट्या समाजाच्या बळावर निवडून येणे अशक्य असते. परंतु आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या-त्या मतदारसंघात पोहोचला आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत ड्रॅगन फ्रूटच्या शेतात ‘लोकमत’च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी ही माहिती दिली.

प्रश्न: अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली?या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी माघार नाही तर निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठा उमेदवार पराभूत झाले असते तर त्याचा फटका आरक्षण आंदोलनाला बसला असता. राजकारण हा माझा प्रांत नाही. मला समाजासाठी लढायचे आहे. त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. तो मी एकट्याने घेतला नाही. मराठा समाजबांधवांशी चर्चा केली. त्यांनाही माझे म्हणणे पटले. नंतर मी हा निर्णय जाहीर केला, असे जरांगे यांनी सांगितले. प्रश्न: तुम्ही शब्द दिला म्हणून आजही अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. हे का घडले? यावर जरांगे म्हणाले, ज्यांना समाजासाठी लढायचे होते. त्यांनी माझ्या आवाहनानंतर माघार घेतली. ज्यांना समाजाची मदत घेऊन फक्त आमदार व्हायचे होते ते रिंगणात कायम आहे. मराठा समाजाने राजकारणात पडूच नये. जेवणातील लोणच्याप्रमाणे राजकारण करा. आगामी दहा-बारा दिवस हे चालू द्या. नंतर आपल्या पोरा-बाळाच्या भविष्यासाठी आंदोलनात वेळ द्या. त्यांचे भविष्य उज्ज्वल करा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना दिला.प्रश्न: तुमच्या आंदोलनामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण झाली असे वाटत नाही का?या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी असा आरोप केला जातो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आजही आम्ही सर्वजण एकच आहोत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. उलट जे असा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याच मागे समाज नाही. प्रश्न: शरद पवारांचा फोन येतो का?१३ महिन्यांपासून मी फोन वापरणे बंद केले आहे. मग मला फोन कसा येईल? माझ्या मराठा समाजबांधवांसाठी मी माझ्या डोक्याने चालतो. कोण म्हणतो रिमोट पवारांचा, कोण म्हणतो शिंदेंचा? रिमोट माझ्याच हातात असून बदनामीसाठी सोयीने ही नावे घेतली जातात, असे जरांगे म्हणाले.प्रश्न: ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र?आंदोलनासाठी राज्यातील ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले. एका कुटुंबात पाच असे गृहीत धरले तर जवळपास तीन कोटी लोकांना आरक्षणाचा फायदा झाला.  रोज पाच-दहा मराठा तरुण मला नोकरी लागली असे सांगायला येतात. हे यश मराठा समाजाच्या एकजुटीचे आहे. स्वार्थासाठी या समाजाचा मी कधीच विश्वासघात करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.प्रश्न: लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांसाठी लाखोंचा खर्च करतो कोण? या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘आता वडीगोद्रीला जायचे म्हटले तर माझ्या खिशात दहा रुपये नाहीत. पैसा लागतो कशाला? कोटींच्या संख्येने समाज माझ्या पाठीशी आहे. स्वयंस्फूर्तीने ते खर्च करतात. मला एक रुपयासाठी कधी हात पसरावा लागला नाही. वर्गणी गोळा करून ते खर्च करतात आणि हाच समाज माझी ताकद आहे.’

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक