शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नहार खून प्रकरणाचे धागेदोरे सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 01:08 IST

परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांचा मंठा-जालना मार्गावरील वाटूर फाट्याजवळ गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली परंतु सबळ पुरावा हाती येत नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहा दिवसांपूर्वी परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांचा मंठा-जालना मार्गावरील वाटूर फाट्याजवळ गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आरोपी आहेत. परंतु सबळ पुरावा हाती येत नसल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नाही.नहार यांना यापूर्वीही जालना येथील व्यापारी विजयराज सिंघवी यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये म्हणजेच बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातही नहार हे संशयित आरोपी होते.दरम्यान, दहा दिवसांपूर्वी पररतूर येथून अर्ध्या तासात जालना येथे जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या नहार यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपास अंतिम टप्प्यात आला आहे. परंतु आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे तो सबळ पुरावा अद्याप हाती आलेला नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात नेमके कोण होते, हे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही. उच्च पातळीवर याचा तपास सुरू असून, प्रचंड गोपनियता बाळगली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी