शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

आता पाच वर्षे वाट पाहणार नाही; कैलास गोरंट्याल यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 16:04 IST

मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला.

जालना : जिथं आपण अधिक काम केलं तिथं आपल्या विरोधात फतवे निघाले. आजवर इमानदारीने काम केलं. मी पाच वर्षे वाट पाहणार नाही. जालन्यात राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार असल्याचे सांगत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले.

खा. कल्याण काळे यांनी सुरू केलेल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोरंट्याल बोलत होते. गोरंट्याल यांनी आजवर केलेले काम आणि निवडणुकीत झालेला पराभव यावर मत व्यक्त केले. जालन्याच्या पाण्याचा प्रभावच वेगळा आहे. इथं चांगले काम केले की लोकं जा.. ना.. असे म्हणतात. मी महापौर म्हणून किंवा उमेदवारीसाठी कोणला आश्वासने दिली नाहीत. त्याचा फटका मला बसला. इथं तुम्ही किमान २५ जणांना 'तूच महापौर होणार' असे म्हणा असेही गोरंट्याल खा. काळे यांना म्हणाले. आपण आणखी पाच वर्षे वाट पाहू शकत नाही. राजकीय भूकंप कसे येतात हे लवकरच दिसेल. झालेल्या राजकीय वस्त्रहरणास मी चेकमेट करणार आहे. परंतु, तत्पूर्वी जवळील साप, विंचवांना बाहेर काढणार असल्याचेही गोरंट्याल यावेळी म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही गोरंट्याल यांनी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यात खासदारांच्या पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आपण पाच वर्षे वाट पाहणार नाही, असे म्हणत पक्षबदलाचे संकेतच गोरंट्याल यांनी दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

खोतकरांच्या निवडणूक उमेदवारी अर्जावर गोरंट्याल यांची याचिकाजालना विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार अर्जुन खोतकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खोतकर यांच्या उमेदवारी अर्जाबाबत लेखी स्वरूपात आक्षेप जालना विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असा आक्षेप गोरंट्याल यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंट्याल यांचा आरोप आहे. न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल, अशी अपेक्षाही गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेस