शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

जालना जिल्ह्यात २०९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने सोयाबीनसह कपाशीच्या उत्पनावरही परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पन्न तर यंदा ४० टक्यांनी कमी होणार असल्याचे जालना बाजारपेठेतील आजच्या आवकेवरून दिसून येते. खरीप हंगामा नंतर पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा रबीच्या तयारीकडे वळविला आहे. रबी हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतक-यांना २०३ कोटी रूपयांचे पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सहकार निबंधक एन.व्ही. आघाव यांनी दिली.जालना जिल्ह्याला चालू खरीप आणि रबी हंगामासाठी कृषी पत आराखड्यात एकूण एक हजार ४६८ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. पैकी खरीप हंगामात एक लाख २२ हजार शेतक-यांना जवळपास ८०३ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचेही आघाव यांनी सांगितले. यंदा पीककर्जाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तालुका निहाय तहसील, बँक आणि सहकार अशा तीनही विभागांचे एकत्रित मेळावे आयोजित केल्याने मोठा चांगला फरक पडला. पीककर्ज माफीनंतर नव्याने पीककर्ज देण्यासाठीची लगबग सुरू झाली होती. मात्र काही एक दोन बँका वगळता अन्य बँकांनी पीककर्ज वाटपासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्मचारी मागवून शेतक-यांना मदत केली.तयारी : रबी हंगामासाठी सरसावले शेतकरीशेतकºयांनी आता सोयाबीनवर नांगर फिरवून रबी हंगामासाठी शेतीची मशागत करण्याचे नियोजन केले असून, ज्वारी, गहू अणि हरभरा ही पिके लावण्यावर यंदा भर राहणार असल्याचे दिसून येते.कोरडवाहू शेतक-यांसाठी आता पूर्णपणे भिस्त ही परतीच्या पावसावर राहणार आहे.नवरात्रात ज्वारीची पेरणी झाल्यावर दोन ते तीन मोठे पाऊस पडल्यास ज्वारीची चिंता दूर होऊ शकते. मात्र ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था आहे, ते शेतकरी गहू आणि हरभरा लावण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagricultureशेती