शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:44 PM

शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये प्रसिध्द झाली आहेत. शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर शनिवारी दुपारपर्यंत १७०० हून अधिक शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे.महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतक-यांचे बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्या शेतक-यांचे आधार क्रमांक संलग्निकरण करून घेण्यात आले. त्यानंतर शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर १ लाख ८१ हजार शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली होती. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली होती.शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या दुस-या यादीत जालना जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अंबड तालुक्यातील १३७ गावातील १९ हजार २९९, बदनापूर तालुक्यातील ९० गावातील १२ हजार ३५१ शेतकरी, भोकरदन तालुक्यातील १५२ गावातील २३ हजार ९८० शेतकरी, घनसावंगी तालुक्यातील ११४ गावातील १६ हजार ७२ शेतकरी, जाफराबाद तालुक्यातील १०३ गावातील १५ हजार ६४८ शेतकरी, जालना तालुक्यातील १४३ गावातील १९ हजार ४४३ शेतकरी, मंठा तालुक्यातील ११२ गावांमधील १० हजार ०६ शेतकरी तर परतूर तालुक्यातील ९७ गावातील १३ हजार ३५९ शेतक-यांचा या दोन्ही यादीत समावेश करण्यात आला आहे. कर्जमुक्तीच्या दोन्ही याद्यांमध्ये जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याद्या गावस्तरावर प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरणासाठी आपलं सरकार केंद्रावर एकच गर्दी केली होती.कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत आपले नाव आल्याचे समजताच गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथील गंगूबाई भगवान जोशी या शेतकरी महिलेने आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत त्यांचे ७१ हजार ९२ रूपयांचे कर्ज माफ झाले आहे.१११३ केंद्रावर प्रक्रियाकर्जमुक्तीच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्यातील १११३ आपलं सरकार केंद्रावर शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले जात आहे. आधार प्रमाणिकरणासाठी जाताना शेतक-यांनी यादीत आपल्या आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले बँकेतील कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल सोबत नेणे गरजेचे आहे.आधार क्रमांकाच्या ३६ तक्रारीकर्जमाफीच्या पहिल्या यादीत आधार क्रमांक चुकल्याबाबत ३६ आॅनलाईन तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. पैकी ५ तक्रारींचे निरसण करण्यात आले आहे. तर ४ तक्रारी जिल्हा समितीकडे प्रलंबित आहेत. तर २७ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. यात बदनापूर तालुक्यात ३, भोकरदन २, घनसावंगी १५, जाफराबाद ५, जालना व परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ अशा एकूण २७ तक्रारी आहेत. एकूण ३१ तक्रारींचा निपटारा होणे बाकी आहे.पाच कोटी कर्जखात्यात वर्गटेंभुर्णी व तीर्थपुरी येथील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रथम प्रसिध्द झाली होती. या दोन गावातील ६९५ शेतक-यांच्या कर्ज खात्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४ कोटी ९७ लाख २२ हजार ४९६ रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी