शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 19:34 IST

चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. : मनोज जरांगे

वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी दिवसभरात समाजाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेल्या १८०० वर इच्छुकांशी चर्चा केली. या चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. आज केवळ चर्चा झाली असून, अंतिम निर्णय हा २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत समाज घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षण आंदोलन, निवडणुकांबाबत आज इच्छुकांशी चर्चा केली आहे. पुढे कसे जायचे, निवडणुकीचे चांगले-वाईट परिणाम यासह इतर बाबींवर चर्चा झाली. आम्हाला ९५ टक्के समाजकारण आणि ५ टक्के राजकारण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व समाज महत्त्वाचा आहे. आज मराठा समाजासह मुस्लिम, मागासवर्गीय, १८ पगड जातीतील समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आज केवळ चर्चा झाली आहे. १८०० वर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. याला गर्दी न म्हणता समाजाच्या आक्रोशाची लाट म्हणता येईल. ही लाट शंभर टक्के विजयाकडे जाणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. शेवटी लढायचे की पाडायचे याचा अंतिम निर्णय हा समाज घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

बैठकीला मोठी गर्दीआगामी विधानसभेत लढायचे की पाडायचे यावर जरांगे पाटील यांनी इच्छुकांना अंतरवाली सराटी येथे बैठकीसाठी बोलाविले होते. अंतरवाली सराटी हजारोच्या संख्येने इच्छुक उपस्थित होते. यादरम्यान लढायचे की पाडायचे याबाबत सर्वांनी आपले मते मांडली. ही बैठक सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालू होती. यावेळी रामगव्हाण रोडला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण