शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप सरकारने केले द्वेषाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:10 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे राज्यप्रमुख आ. रामहरी रुपनवार यांनी येथे बोलतांना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षात रसातळाला नेले आहे. व्देषाचे राजकारण करुन समाजात फूट पाडण्याचे काम सरकारने केले असून, कॉंग्रेस पक्षाने सातत्याने सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समतेच्या विचाराची मोट बांधली आहे, हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन संवाद कार्यकर्ताप्रशिक्षण शिबिराचे राज्यप्रमुख आ. रामहरी रुपनवार यांनी येथे बोलतांना केले.जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी येथील श्री गुरु गणेश मंगल कार्यालयात आयोजित एक दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख तर माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथलिया, संतोषराव दसपुते, भीमराव डोंगरे, डॉ. संजय लाखे पाटील, विजय कामड, ज्ञानेश्वर भांदरगे, सत्संग मुंडे, अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे प्रशिक्षक राजीव साहू, लेखा नायर, विनोद नायर, नवशाद परमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.अ. भा. कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उपस्थित प्रशिक्षकांनी कॉंग्रेस पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि मोदी सरकारची खोटी आश्वासने, मोदींची जुमलेबाजी, चित्रफितीतून भाजपा सरकारचा खरा चेहरा उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मांडला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण