शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

२८८ जागांची तयारी ठेवा, पुढच्या महिन्यात निर्णय घेऊ; मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 1:45 PM

मागील ११ महिन्याच्या आंदोलन काळातील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी पाचवे उपोषण

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : मराठा आरक्षणासाठी सरकारने धोका दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याची वेळ आली आहे. शरीर किती दिवस साथ देईल माहीत नाही. समाज उपोषण करू नका अशी विनंती करत आहे, मात्र त्यांच्यासाठीच बेमुदत उपोषणास सुरुवात करत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागील ११ महिन्यांच्या काळात मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथील पाचवे उपोषण आहे. उपोषण कठोर करणार असून या काळात पाणी, औषधोपचार घेणार नसल्याचे जरांगे यांनी यावेळी जाहीर केले. 

मागेल त्या मराठ्याला सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे  कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा कुणबी एकच आहेत, मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर सुशीलकुमार शिंदे यांनी काढला होता. सगेसोयरे आमची मागणी कायम आहे. सगळ्या केसेस मागे घ्या, हैद्राबाद सातारा गॅझेट लागू करा, तिन्हीही गॅझेट लागू करा, मराठा समाजाला ओबीसीत सरसकट आरक्षण द्या, या मागण्या जरांगे यांनी केल्या. तसेच कुणबी नोंदी शोधणं, सापडणं बंद आहे.मनुष्यबळ वाढवा, मोडी लिपी तज्ञांना सरकारने पेमेंट केलेलं नाही, त्यांचा पगार द्या, अधिकारी टाळाटाळ करतायत, शिंदे समितीचं काम वाढवा असेही जरांगे म्हणाले.

मराठा मुलांना नोकर भरती, शिक्षणात अडचणनोकर भरती, प्रवेश यात मराठा मुलांना अडचणी येत आहे.कुणबी प्रमाणपत्र असूनही ओपनमध्ये ढकलल्या जात आहे.नोकर भरतीत जात प्रमाणपत्र घेतलं जातं नाही. मराठा मुलांना यांनी एकेक वर्ष बरबाद करायचं ठरवलं आहे. भरतीसाठी कुणबी प्रमाणपत्र असूनही ते घेतलं जातं नाही. ई डब्ल्यू एस , एस इ बी सी,कुणबी असे तिन्हीही पर्याय मराठा मुलांना भरतीसाठी  सुरू ठेवा,नोकर भरतीत जात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी 6 महिन्याची मुदत द्या. सारथीच्या मुलांना काय अडचणी आहेत जरा त्यांना विचारुन बघा. दादा तुम्ही म्हणता मुलींना शिक्षण मोफत केलं या अंतरवालीत बघा कुठं सुरुय मोफत शिक्षण बघा जरा असे चंद्रकात पाटील यांना जरांगे यांनी सुनावले.

निवडणूक झाली की सगळं बंद पडेलसरकारने फक्त योजनेच्या नावाखाली लोक नादाला लावले आणि योजनेच्या अंमलबजावणीचा पत्ता नाही, म्हाडा, समृद्धी, शक्ती मार्गात हेच पाहायला मिळालं. मराठा, धनगरांना येड्यात काढायच आणि आरक्षण द्यायचं नाही असं तुम्हाला करायचं आहे का? लाडकी बहीण त्यासाठी आणलीय का, लाडका भाऊ त्यासाठी आणले आहे का? आता लाडकी मेव्हणी देखील येईल, सरकारने हा डाव टाकला आहे. निवडणूक झाली की हे सगळं बंद पडेल, लाडक्या बहिणीचे दिड हजार घेऊन काहीही होणार नाही.आमचं म्हणणं आहे हे देऊ नका आरक्षण द्या.  आमच्या नोंदी रद्द करा असं भुजबळ म्हणतायत, नोंदी सगळ्याच भागातील रद्द करून तुम्ही तुमचं चांगलं करून घेणार का ? असा सवाल जरांगे पाटील यांनी भुजबळांना केला. धनगर समाजाने सरकारच्या नादाला लागू नये.छगन भुजबळच्या देखील नादाला लागू नये. हे गोर गरीबांना आरक्षण मिळू देणार नाही, अशी टीका जरांगे यांनी केली. 

२८८ जागांची तयारी करा, २९ ऑगस्टला बैठकीत निर्णय घेऊयेणाऱ्या काळात दौरे होणार तिथे ताकदीने तयारी करा. उपोषण सुटलं नाही तरीही रुग्णवाहिकेने दौऱ्यात येणार. कार्यक्रमाची तयारी करा राज्यात कुठेही आंदोलन करून मराठा समाजाने शक्ती दाखवू नये.  २९ ऑगस्टला राज्यातील आंदोलनाची वर्षपूर्ती आहे. या दिवशी बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार पाडायचे का नाही हे ठरवू. १३ तारखेपर्यंत मी दौऱ्यावर असेल. पण १३ ते २० ऑगस्ट दरम्यान बैठका घेणार आहे. राज्यातील मराठा बांधवांनी आपापल्या भागाचा डेटा तयार ठेवावा. निवडणूकीची तयारी करावी. सगळ्या समाजाचा डेटा तयार ठेवावा. इच्छुकांनी सुद्धा बैठकीला यावे. २८८ मतदार संघात तयारी करा. २० ते २७ ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे. आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे. सर्व समाजाला आमचं निमंत्रण आहे. त्यांनी चर्चेला यावे सर्व समीकरणं जुळले तर निवडणूक लढवता येईल. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचं आहे. क्रॉसिंग करायचं नाही. जर मराठा समाजाचं ठरलं तर मराठ्यांचे एकही मतदान वाया जाऊ द्यायचे नाही. आपण जर निवडणूक लढवू म्हटलं तर युती वाले खुश होतायत,निवडणूक लढवली नाही तर महाविकास आघाडीवाले खुश होतात.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना