शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

४० हजार संकल्प पत्राद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:36 AM

शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत निवडणूक आयोगाचे या निवडणुकीचे ब्रीदवाक्य सुलभ निवडणुका असून सोबतच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शहरासह खेड्यापाड्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विविध प्रकारे जनजागृती स्वीप उपक्रमांतर्गंत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांमार्फत त्यांच्या पालकांकडून ४० हजार ‘संकल्प पत्र’ जालना तालुक्यातील १७ केंद्रांसह शहरातील शाळांंमधून शुक्रवारपासून भरुन घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तथा तालुका स्वीप नोडल अधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील संकल्प पत्र जालना तालुक्यातील मुलांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविले जात असून या पत्रात विद्यार्थांची व पालकांची सविस्तर माहिती विचारण्यात आली आहे. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत धर्म, जात, वंश व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचा व लोकशाही बळकटीकरणाचा संकल्प करत आहोत, असा संदेश घराघरात पोहोचविला जातोय.दरम्यान, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील मुलांकडून हे पत्र भरुन घेतल्या जात आहे. तरी पालकांनी हे पत्र भरुन आपल्या पाल्याकडे द्यावे, असे आवाहन ही निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.यावेळी पुढे बोलतांना खरात म्हणाले की, १ एप्रिलपर्यंत सर्व संकल्प पत्र भरुन परत घेतले जाणार असून, नंतर ते तालुका स्वीप कक्षात ठेवले जातील असे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकStudentविद्यार्थीSocialसामाजिक