शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:53 IST

सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून जालना शहर व ग्रामीण भागाचा विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना नगर परिषदेच्या वतीने घाणेवाडी जलाशय तुडूंब भरल्यानंतर या पाण्याचे शनिवारी पूजन करण्यात आले. यावेळी घाणेवाडी जल संरक्षण मंचसह रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी उद्योजक सुनिल रायठठ्ठा यांनी या ऐतिहासिक तलावाचे जालन्याची तहान भागविण्यासाठीचे महत्त्व विषद करून याचे जतन करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले, जायकवाडी येथून जरी योजना केली आहे. तरी देखील घाणेवाडी जलाशयातून विना विद्युत खर्चाचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे याकडे आपले जातीने लक्ष राहणार आहे. मध्यंतरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला. थिंक टँक स्थापन करणारजालना शहराचा विकास नेमका कशा पध्दतीने केला जावा, यासाठी नागरिकांमधून सूचना मागविण्यात येतील, या सूचनांवर त्या- त्या विभागातील तज्ज्ञांचे मत आणि मार्गदर्शन घेतले जाईल. यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच यासह शहरातील अन्य सामाजिक व्यक्ती आणि संस्थांना सोबत घेऊन थिंक टँक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केली.

टॅग्स :MLAआमदारJalana Muncipalityजालना नगरपरिषदRural Developmentग्रामीण विकास