शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:31 IST

दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले. या विवाहमंचच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जवळपास ३९ विवाह जुळविले आहेत. मुळात त्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो, यातूनच ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.पुनर्विवाहात कुठल्या अडचणी आहेत ?एकीकडे आपण साक्षर होऊन शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतले. परंतु ज्यांनी हे शिक्षण घेतले. त्यांच्याच कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद होऊन विवाह संस्थाच धोक्यात आली आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी अशिक्षित पती-पत्नीमध्ये समेट घडविण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही. तेवढा वेळ शिक्षित असलेल्या जोडप्यांसाठी खर्च करावा लागतो. विधवा मुलींचा तर प्रश्नच वेगळा आहे. नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. हे समजून घेण्यास समाज आजही तयार नसल्याने मोठी खंत आहे.किती विवाह जुळविले ?सुतार समाज मंचच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटित मुला-मुलींचे ३९ विवाह गेल्या तीन वर्षात जुळविले आहेत. तर अनेकांचे संसार तुटण्यापासून मंचने पुढाकार घेतला. यात समाजबांधवांचाही सिंहाचा वाटा आहे.हलाखीतून भरारीमूळचे जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील असलेले भालेकर यांनी शालेय शिक्षण पोटाला भाकरी मिळत नसल्यामुळे अर्धवट सोडले. हॉटेलमध्ये काम करून उपजीविका भागविली. परंतु जिद्द सोडली नाही. याकामी मला समाज बांधवांसह इतर समाजांतूनही हिंमत मिळत गेली आणि त्यातूनच आज मी हे सामाजिक कार्य करतो.

टॅग्स :Socialसामाजिकcommunityसमाजmarriageलग्न