शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:44 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असला तरी गत दोन दिवसांत वीज पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ५.८६ मिमी पाऊस झाला.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जालना महसूल मंडळात १० मिमी, जालना ग्रामीण ६ मिमी, रामनगर, विरेगाव, पाचन वडगावमध्ये २ मिमी, तर सेवली ४ मिमी व वाघ्रूळ जहागीर मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झाली.बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी महसूल मंडळात ४० तर दाभाडी मंडळात ६ मिमी पाऊस झाला. भोकरदन मध्ये २ मिमी, धावडा २३ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ५ मिमी, हसनाबाद २ मिमी, राजूर ५ मिमी तर केदारखेडा शिवारात ७ मिमी पाऊस झाला आहे. परतूर महसूल मंडळात १५.८० मिमी पाऊस झाला. मंठा, ढोकसल ५ मिमी तर पांगरी गोसावीत ८ मिमी पाऊस झाला. अंबड २ मिमी, धनगर पिंपरी ७ मिमी, जामखेड २६ मिमी, वडीगोद्री १५ मिमी, गोंदी ७ मिमी, रोहिलागड २२ मिमी पाऊस झाला. घनसावंगीत ७ मिमी, रांजणी १५ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव ५ मिमी, अंतरवली टेम्बी २३ मिमी तर जांभ समर्थ येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.१७ मंडळे कोरडीजिल्ह्यातील ३९ पैकी १७ महसूल मंडळांत पाऊस झाला नाही. यात बदनापूर तालुक्यातील बदनापूर, रोषणगाव, सेलगाव, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार, अन्वा, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, टेंभुर्णी, कुंभारझरी, वरूड, माहोरा, परतूर तालुक्यात सातोना, आष्टी, श्रीष्टी, वाटूर, मंठा तालुक्यातील तळणी, अंबड तालुक्यातील सुखापुरी तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव महसूल मंडळात पाऊस झाला नाही.रामनगर : वीज पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यूरामनगर : जालना तालुक्यातील दहिफळ (काळे) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दुसरीत शिकत असलेला महेश गणेश राऊत (९) दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर आला. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या जुना टॉवरजवळ तो खेळत असताना अचानक वीज अंगावर पडली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.दानापूर शिवारात लिंबाच्या झाडावर पडली वीजदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर शिवारात मनसुबराव औचितराव पवार यांच्या वखारीवर लिंबाचे झाड आहे. या झाडावर सोमवारी दुपारी वीज पडल्याने झाड जळाले. पाऊस सुरू झाल्याने मनसुबराव पवार, चंद्रकला पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्ता पवार, सोनू पवार, संदीप पवार, रामेश्वर पवार यांनी वखारीवर प्रवेश केला.तर दत्ता पवार हा पाणी पिण्यासाठी लिंबाच्या झाडा जवळील हौदावर गेला होता.तो पाणी पिऊन परत आला. त्यानंतर काही क्षणातच लिंबाच्या झाडावरती वीज पडली. वेळेवर वखारीवर गेल्याने आम्ही बचावल्याचे मनसुबराव पवार यांनी सांगितले. दरम्यान, पडसखेडा मुर्तड येथेही पावसामुळे कपाशी, मका, मिरची इ. पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुभेदार चौधरी, विश्वनाथ वरपे यांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDeathमृत्यू