शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 2:23 PM

वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे.

जालना : अनैतिक संबंध, मालमत्ता,‎ कौटुंबिक कलह, शेती, आर्थिक‎ व्यवहार अशा विविध प्रकारांतील‎ वाद विकोपाला गेल्यामुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात तब्बल ८ खून झाले आहेत. त्यापैकी सर्व खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही खुनांतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. एकाच महिन्यांत आठ खून झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे. जालना पोलीस दलाकडून गुन्हे नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने कारवाया केल्या जात आहेत.

मार्च महिन्यात जिल्ह्यात खुनांची मालिकाच पाहायला मिळाली. एकापाठोपाठ तब्बल सात खून १५ दिवसांत झालेत. त्यानंतर एक खून झाला आहे. एक महिला व सात पुरुषांचे खून झाले आहेत.

तीन महिन्यांत १६ खूनगेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात १६ खून झाले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत केवळ ८ खून झाले होते, तर एकट्या मार्च महिन्यात ८ खून झाले आहेत.

अशा घडल्या खुनाच्या घटना१) वडिलोपार्जित शेती बळकावल्याच्या कारणावरून जालना तालुक्यातील मोहाडी छबू घासू राठोड (५३) यांचा पुतण्यानेच खून केला होता.२) भांडणातून मित्रानेच भगवान राजू तळेकर (२३) या चालकाचा खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी पाटीजवळ घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे घडली होती.४) अंबड शहरातील रामेश्वर अंकुश खरात (२०) या तरूणाचा खून करण्यात आला.५) जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथे बैल चोरीच्या संशयावरून शेजाऱ्यानेच सोमीनाथ श्यामराव जाधव ( ४३) यांचा खून केला होता.६) शेजारी राहणाऱ्या महिलेने साथीदारासह जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील महिला सुमनबाई माणिक जिगे (६५) यांचा खून केला होता.७) जालना तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी राजकुमार भास्कर साळवे (३२) यांचा खून करण्यात आला होता.८) आर्थिक देवाण-घेवाणीवरून फुलंब्री येथील राजेश मुरलीधर जाधव (४२) यांचा खून करून मृतदेह परतूर तालुक्यातील मांडवा परिसरात आणून टाकला होता. या खुनातील आरोपी अद्यापही मोकाटच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना