शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:08 IST

सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे.

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र जाबंसमर्थ येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नवीन लग्न झालेल्या वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा आजही जांब समर्थाच्या राम मंदिरात पाहायला मिळते. सुमारे ४०० वर्षांपूर्वींचे म्हणजेच समर्थ रामदास स्वामींच्या जन्माअगोदरचे हे मंदिर आहे. या मंदिरात सीता मातेची मूर्ती ही रामाच्या उजव्या बाजूला आहे, या ठिकाणी स्त्रीला आदिमाया शक्तीचा मान दिला आहे. सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे. ती आजही पाहायला मिळत आहे. 

राम मंदिरातील दुर्मीळ वस्तू आजही पाहायला मिळत आहे. यात १) श्रीरामाच्या पायापाशी श्री समर्थ जो दंडावर बांधत असत तो मारोती, २) समर्थांचे वडील सूर्याजीपंत यांना शके १५२५ माघ शुद्ध सप्तमीला प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेले श्रीराम पंचायतन, ३) भिक्षेच्या वेळी समर्थ झोळीत ठेवीत असत, त्या मारुतीची मूर्ती, ४) रामनवमी उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते. त्यावेळी समर्थ रामदासांनी राम मंदिरातील समोरील आडातील पाणी काढून खापराच्या घागरीतून वाढले ती घागर आजही पाहायला मिळते. 

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे समर्थ रामदास स्वामी समर्थांचा जन्म शके १५३० चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच १६०८ ला रामनवमीच्या दिवशी रामाच्या जन्माच्या वेळी झाला. श्रीराम प्रभू व समर्थ रामदास या दोघांच्या जन्मतिथी व जन्म वेळ एकच असण्याचा विहंगम योग इतरत्र कोठेही आढळून येत नाही. रामदास स्वामींच्या जन्माने पावन झालेले जांब आज महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे प्रेरणास्थान, यात्रास्थान बनले आहे. समर्थांच्या पूर्वजांनीच ते वसविल्याचा इतिहास आहे. या गावाच्या कुळकर्णीपणाचे वतनही पिढ्यान्पिढ्या समर्थांच्या घराण्यात चालत आले आहे. 

दरवर्षी रामनवमीनिमित्त नऊ दिवस जन्मोत्सवज्या ठिकाणी श्री समर्थांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी श्री समर्थांनी विश्वाची चिंता केली व मातोश्री राणूबाईंना, म्हणजेच त्यांच्या आईला त्यांनी डोळे दिले ती ही पवित्र भूमी. या ठिकाणी समर्थांच्या जागेचा शोध घेतला व नेमका ज्या खोलीमध्ये श्रीसमर्थांचा देह धरणी मातेने झेलला ती जागा शोधून काढून तेथे समर्थ भक्त धुळ्याचे श्रीकृण देव यांनी भव्य असे मंदिर बांधले. दरवर्षी येथे रामनवमी उत्सवानिमित्त नऊ दिवस जन्मोत्सव साजरा केला जातो, तसेच वर्षातून अनेकदा धार्मिक कार्यक्रम होतात, त्याला महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

टॅग्स :JalanaजालनाRam Navamiराम नवमी