शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

लहानपणापासून विधीमंडळात आमदारांचा राडा पाहतोय, सगळे एकाच माळेचे मणी: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:10 PM

मनोज जरांगेंची विधीमंडळात आमदारांच्या गोंधळावर टीका

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : तुमची इच्छाशक्ती असेल तर द्या न आरक्षण, उगा विरोधक आले नाही म्हणून एकमेकांवर बोलू नका, आम्हीं ही बघू आरक्षण कसं मिळवायच. विधीमंडळात लहानपणापासून या आमदारांचा राडा बघतोय. सरकार आणि विरोधक दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर केली. आज जालना येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जालनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे सकाळी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, हैद्राबादवरून गॅझेट आणलं अशी माहिती शंभुराजे यांनी दिली आहे. मागेल त्या मराठ्याला कुणबी नोंदीच्या प्रमाणपत्र त्या आधारे द्यावे. आम्ही शंभुराजे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व बांधवांची बैठक घेऊन २८८ जागांवर पाडायचे किंवा निवडून द्यायचे याचा निर्णय जाहीर करू, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. 

नुकसान झालं तर आता सहन करणार नाही

सगळीकडे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठ्यांनी देखील आता एकत्र यावे. जातीसाठी एकत्र या. जात प्रमाणपत्राची व्हॅलीडिटी दिली जात नव्हती. कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाही. याबाबत सरकारशी बोलणं झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, मराठ्यांची अडवणूक करू नका आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही, ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. अधिकारी देखील जातीयवादी आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना