शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

'साहेब, मदत साऱ्यांनाच मिळायला पाहिजे'; दानवेंवर शेतकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:43 IST

प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केला

- संजय देशमुख 

जालना : यंदाचा साल गेल्या सालापेक्षा लई खराब चाललाय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. आता अधिकारी आणि कर्मचारी शेतात पंचनामे करीत आहेत. मात्र, प्रत्येकाचेच नुकसान झाल्याने साऱ्यांनाच मदत मिळेल काय? असा सवाल शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला. दानवेंसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. 

दानवे यांनी मंगळवारी सकाळी जालना तालुक्यातील दरेगाव शिवारालगत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येण्याचा आग्रह मंत्र्यांना केला. प्रारंभी दानवे यांनी कपाशी तसेच मका पिकांचे जे शेतात जास्त नुकसान झाले आहे. तेथे जाऊन पाहणी केली. एका महिला शेतकऱ्याने आम्ही ही जमीन गावातीलच एका शेतकऱ्याकडून भाडे पद्धतीने घेतली आहे, असे सांगितले. यावर दानवे यांनी संबंधित शेती मालक ढवले यांच्याशी चर्चा करून शेती कसणाऱ्या कुटुंबाला देखील शासकीय मदतीतून हिस्सा द्यावा, असे सांगितले. शेतातील पाहणी आटोपल्यानंतर दानवे यांनी दरेगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यावेळी विष्णू पिवळ या तरूण शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रेरणा प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.   पंचनामे ज्या प्रमाणे होतील, तशी नुकसान भरपाई सर्वांनाचा मिळेल अशी ग्वाही  दानवे यांनी यावेळी दिली. या दौऱ्याच्या वेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. 

बँक व्यवस्थापकाची घेतली झाडाझडती शेतकऱ्यांशी संवाद सुरू असतानाचा राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफी दिली आहे. ती किती जणांनी मिळाली, असे विचारल्यावर अनेकांनी ती मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तुमची बँक कोणती असा सवाल दानवे यांनी करून थेट बँकेच्या अधिकाऱ्याला मोबाईलवरून संपर्क केला. यावेळी २८६ शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्याकडून दानवे यांनी मोबाईलचा स्पीकर आॅन करुन ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. अशांची यादीच वाचून घेतली. तसेच प्रशासनाने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच त्या पोहोचल्यामुळे आम्हाला फटका बसला. (लीड कमी मिळाली) असे सांगून हशा पिकविला.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे