शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:47 IST

अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : पेट्रोल, डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. अशा सायकलींच्या वापरामुळे पेट्रोल वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करता येणार आहे.अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्युत विभागात शिकणा-या अशोक कोटंबे, अभिषेक लांडे, शांभवी जपे, आकांक्षा काठमांडे, दिप्ती चावरे या पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. यासाठी त्यांना त्यांचे शिक्षक डी. एस. बनसोड यांनी मार्गदर्शन केले. सौर ऊर्जेवर चालणारी सायकल या त्यांच्या प्रयोगाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतेची ओळख निर्माण करून दिली आहे. सौर ऊर्जेवर एक तासात ३० किलोमीटर अंतर या सायकलने गाठता येते. तापमानात बदल घडून आल्यास पायंडल मारूनही सायकल चालविता येऊ शकते. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी सोलर संच, बॅटरी, कंट्रोलर, डीसी मोटर आदी साहित्यांचा वापर केला असून, जवळपास २० हजार रूपये खर्च आला आहे. या सायकलीला समोर लाईट, हॉर्न आणि इलेक्ट्रिक ब्रेक्स आहेत. त्यामुळे रात्रीच्या प्रवासातही या सायकलाचा वापर करता येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही सायकल तालुक्यातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय ठरत असून, या सायकलवर विद्यार्थी अंबड ते अंतरवाली सराटी हा प्रवास करीत नागरिकांना माहिती दिली आहे.अशोक आणि त्यांच्या मित्रांचे आई-वडील मजुरी करतात. त्यांना पुढील उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आहे. मात्र, घरात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यातच शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. मात्र, मुलांनी तयार केलेली सायकल पाहून त्यांंना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अशोक कोटंबेच्या पालकांनी सांगितले.सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मुलांनी आपल्या संकल्पनेतून सौर ऊर्जेवर चालविणारी सायकल तयार केली आहे. या मुलांच्या कर्तृत्वाला चालना मिळण्यासाठी शासनाने विविध योजनांद्वारे आर्थिक मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेज