शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

घनकचऱ्याचा प्रश्न सुटणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:42 AM

स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. जालना शहरात सध्या दररोज १०५ टन कचरा निघतो. कच-याचे घरोघरी जाऊन संकलन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नसल्याने काही कामे खाजगी एजन्सीमार्फत करावी लागतात. शिवाय २००८-०९ मध्ये सामनगाव येथे पथदर्शी म्हणून सुरू करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाचे कामही रखडले आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासह शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नगरविकास विभागाने जालना शहरासाठी १६ कोटी, ५२ लाख ३९ हजारांच्या नागरी घनकचरा व्यवस्थाप प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र व राज्यशासनाकडून मिळणा-या निधीबरोबर नगरपालिकेलाही यात लोकवाटा भरावा लागणार आहे. प्राप्त निधीतून ३३ नवीन घंटागाड्या, दोन डंम्परप्रेसर, लोडर, कॉम्पॅक्टर आदी वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व खरेदी शासनाच्या ‘गव्हर्नमेंट मार्केटप्लेस पोर्टल’ वरूनच करावी लागणार आहे. ओल्या व सुक्या कचºयावरील प्रक्रियेसाठी सामनगाव येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. या सर्व कामांचा सविस्तर अहवाल पालिकेला नगरविकास विभागास वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. येत्या पाच महिन्यात घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नState Governmentराज्य सरकार