शहरं
Join us  
Trending Stories
1
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
3
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
4
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
5
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
6
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
7
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
8
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
9
८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
10
रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त
11
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
12
पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
13
‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
14
सी-लिंकवर महागड्या कारची लागली रेस; वाहतूक एक तास खोळंबली
15
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
16
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
17
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
18
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
19
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
20
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन

सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

By शिवाजी कदम | Published: February 20, 2024 7:30 PM

सरकारने फसवलं, सगेसोयऱ्याच्या कायद्याला बगल दिल्याने पुन्हा आंदोलनाची दिशा ठरणार: मनोज जरांगे

वडीगोद्री : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, आज अधिवेशनात घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. सरकारने सगेसोयऱ्यांच्या कायद्याला बगल देऊन १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल सरकारने उचलले आहे, हे आम्हाला मान्य नाही. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी आयोजित बैठकीत सांगितले. तसेच सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही, असा गंभीर आरोप देखील जरांगे यांनी यावेळी केला.

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, आम्हाला टिकेल की नाही या लफड्यात पडायचं नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे. आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. उगाच समाजाचा अपमान करायचा हे योग्य नाही. सरकारने विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. यासाठी आक्रोश करतोय त्या माता-माउलींची चेष्टा सरकार करत आहे. आम्ही आधीही स्वागत केले होते. आताही स्वागत करतो; पण आमच्या हक्काचे आरक्षण द्या, यापूर्वीही सांगितले होते. ते नाकारण्याचे काही कारणच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

घाईगडबड नाहीच आहे. हरकती तपासण्यासाठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आम्ही संयमी आहोत. उद्या आमचा निर्णय ठरल्यावर त्यांना आमची भावना कळेल. आम्हाला आज हा दिवस बघायला लावला. अंमलबजावणी पाहिजे. हा हट्टीपणा नाहीये अधिकार आहे. सरकारने केलेल्या कायद्यामुळे पोरांचे काही कल्याण होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर इतके दिवस आंदोलन चाललेच नसते. मी लेकरांचे वाटोळे नाही करू शकत. त्यांना मर्यादा आहे तशाच आम्हालाही आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारशी आमची वैयक्तिक काही वैर नाहीये, आंदोलनाची दिशा ठरली की, सगळे उडवणार आहेत. सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी लावला आहे.

उपचार नाकारलेमनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सलाइन काढून घ्या असे म्हणत हाताला टाकलेली सलाइन स्वतः काढण्याचा प्रयत्न केला. आता सरकारचे उपचार बंद, असे जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना