शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बंगल्याची सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 4:40 PM

पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

जालना - पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता, त्याच विधानाचा संदर्भ घेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील घरात साप सोडण्याचा इशार देण्यात आला आहे. त्यानंतर, दानवेंच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील बसपच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला आहे. 

मराठा नेते असलेल्या रावसाहेब दानवेंनी गेल्या 20 वर्षात मराठा समाजासाठी काय योगदान दिलं, असा सवाल बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला. जालना शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोन सुरु आहे. या आंदोलनास येथील बसपच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर, दानवे यांच्या घरात साप सोडण्याची भाषा बसपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यामुळे दानवेंच्या घराबाहेर 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून राज्यभर आंदोलन सुरुच आहे. आजही राज्यात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. तर वाशिममध्ये मराठा आंदोलकांनी मुंडन आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा